Skip to main content

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा संजय थोरात यांची नागरिकांच्या विविध समस्यांविषयी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक...

मंचर प्रतिनिधी:


भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशभरात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवडा राबवला जात आहे. यानिमित्ताने आज चांडोली बुद्रुक या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या तसेच नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी महावितरण कार्यालयाचे कर्मचारी, रेशन  दुकानदार,महसूल विभागाचे कर्मचारी यांच्यासोबत बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या व अडचणी सोडवण्यात आल्या. या वेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा संजय थोरात, जिल्हा सरचिटणीस नवनाथ थोरात,युवा नेते गणेश थोरात,उत्तम राक्षे सर,साजिद सय्यद,कालिदास गांजाळे, गीताभाऊ गुरुजी,शिवाजी थोरात,प्रवीण फुटाणे,अक्षय थोरात,भरत काळे,सुभाष मावकर,दिनेश टेमगिरे,रामभाऊ थोरात,प्रवीण इंदोरे,शंकर काळे तुकाराम थोरात संतोष थोरात पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष संजयशेठ थोरात यांनी नागरिकांना काही समस्या असल्यास भाजप कार्यालय चांडोली बुद्रुक या ठिकाणी येऊन  सांगाव्यात असे आव्हान केले तसेच नवनाथ थोरात यांनी सेवा पंधरवडा निमित्ताने घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली. गणेश थोरात यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले.

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...