Skip to main content

मुख्यमंत्री, मा. खा. आढळराव पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट?

समर्थ भारत वृत्तसेवा:



शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडीचा गोंधळ कायम असून ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार हे आता नक्की झालंय. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात तुल्यबळ ठरू शकणारे उमेदवार मा. खा. शिवाजीराव आढळराव यांना राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय आता कुठलाही पर्याय नाही.

दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेही सक्षम उमेदवार नाही, त्यामुळे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर मा. खा. आढळराव पाटील लढू शकतात असे बोलले जात आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. खा. आढळराव पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा असल्याचे बोलले जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक नेत्यांचा आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये घेण्यास विरोध असल्याचेही चित्र आहे.

या मतदार संघात महाविकास आघाडीकडून डॉ. अमोल कोल्हेंनाच उमेदवारी मिळणार यावर आता शिक्कमोर्तब झाले असून त्यांच्याविरोधात मा. खासदार शिवाजी आढळराव पाटील उमेदवार असतील तरच ही लढत तुल्यबळ होईल असे राजकीय जाणकार सांगतात. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आढळराव पाटील यांच्यातील अजाची वाटाघाटी यशस्वी झाली तर येत्या काही दिवसांत आढळराव पाटील राष्ट्रवादी सोबत जाऊ शक्यता. मात्र त्यांच्या या भूमिकेला अनेक शिवसैनिकांचा विरोध असून, शिंदे सेनेतील अनेक शिवसैनिक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात घरपवापासी करतील अशी शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खा. सुनील तटकरे आणि मा. खा. आढळराव पाटील यांच्यात शिरूरच्या जागेच्या संदर्भात खलबते सुरू असून, या चर्चेमध्ये आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि सभापती (बांधकाम) मंगलदास बांदल हे देखील शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात असून, ते या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.