Skip to main content

आ. रोहित पवारांच्या एन्ट्रीने वळसे पाटलांचे टेन्शन वाढले?

समर्थ भारत वृत्तसेवा:



 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी आणि मानसपुत्र अशी ओळख असलेले आंबेगाव विधानसभेचे आमदार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील अनपेक्षितपणे अजित पवारांसोबत जाऊन शरद पवारांना मोठा धक्का दिला. मंत्री वळसे पाटलांच्या मतदार संघात शरद पवारांची उद्या (दि. २१) जाहीर सभा होणार आहे. या सभेकडे सबंध राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या बॅनर्समुळे पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेसह ग्रामीण परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. पुणे, पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यात फक्त अजित पवारांची दादागिरी! चालत असून; राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी अजित पवार हेच दादा आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर अजित पवारांची ही जागा आमदार रोहित पवार घेत असल्याची बॅनरबाजी आंबेगाव तालुक्यातील मंचर-कळंब परिसरात करण्यात आली आहे. या बॅनरवर 'वादा तोच..! पण दादा नवा' असा मजकूर लिहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, सहकार मंत्र्याच्या गोटात कमालीची खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची उद्या मंचर येथे जाहीर सभा होतीये. त्यासाठी जोरदार तयारी सुरू असून, शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी पवारांच्या बॅनर्सवर 'मी येतोय...' असा संदेश लिहून वातावरण आधीच तापवले आहे तर दुसरीकडे 'वादा तोच..! पण दादा नवा..!',अशा आशयाचे बॅनर्स झळकल्यामुळे पुण्याच्या राजकारणात या बॅनर्सची मोठी चर्चा सुरु आहे. शरद पवार आणि आ. रोहित पवारांच्या बॅनर्समुळे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात वरिष्ठ नेत्यांना फारसे फिरकू दिले नाही, त्यामुळे या मतदारसंघात अजित पवारांचा म्हणावा असा प्रभाव कधीही नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याआधी पासूनच पक्षातील अनेक नेते दोन गटात विभागले गेले होते. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांसोबत असल्याने आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ हा आधीपासूनच शरद पवारांच्या विचारांचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. त्यात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात वादा तोच..! पण... दादा नवा...!', अशा आशयाचे बॅनर्स झळकल्याने आता वळसे पाटलांचे टेन्शन अधिकच वाढले असल्याचे बोलले जात आहे.




पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.