Skip to main content

आंबेगाव तालुक्यात एसटी सेवेचा बोजवारा

समर्थ भारत वृत्तसेवा: 

मंचर ता. : सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून तांबडेमळा (अवसरी, ता. आंबेगाव) येथे एसटी आगार सुरू झाले. त्याचा मोठा गाजावाजा देखील करण्यात आला, मात्र याच एसटीमुळे तालुक्यातील विद्यार्थी, चाकरमाने आणि वृद्ध अक्षरशः वैतागून गेले आहेत. वेळेत एसटी बस सुटने, अचानक रद्द होणे, नादुरुस्त होणे आदी कारणांमुळे तालुक्यातील प्रवाशी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कारभारावर प्रचंड नाराज असून संबंधित अधिकारी आणि फक्त श्रेय घ्यायला पुढे येणाऱ्या नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहत आहेत. आंबेगाव तालुक्यात हजारो विद्यार्थी; शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी, चाकरमाने कामावर जाण्यासाठी, वृद्ध उपचारांसाठी आणि असंख्य नागरिक कुठल्या ना कुठल्या कारणाने एसटीने प्रवास करतात. मात्र हा एसटीचा प्रवास आता बिनाभरवशाचा झाला आहे. वेळेत सुटणाऱ्या एसटीमुळे विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जायला उशीर होतो, तर हातावर पोट असणाऱ्या चाकरमान्यांना उशिरा गेल्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार नादुरुस्त होणाऱ्या जुन्या खटारा गाड्यांमधून प्रवास करताना तालुक्यातील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

विद्यार्थ्यांना बिबट्याच्या हल्ल्याची भीती

मंचर आणि घोडेगाव येथे महाविद्यालयामध्ये ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी वेळे बस मिळत नाहीत, बऱ्याचदा मुक्कामी बस उशिरा येतात किंवा नादुरुस्त/ रद्द होतात. उशिरा निघाले ल्या बस रात्री उशिरा पोहोचतात. या बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्री अंधारात वाट शोधत आपले घर गाठावे लागते. आंबेगाव तालुका हे मोठे बिबट प्रमाण क्षेत्र असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन बिबट्या विद्यार्थ्यांना आपले भक्ष्य बनवू शकतो. या दर्घ टनांची जबाबदारी महाराष्ट्रराज्य मार्ग परिवहन महामंडळ घेणार का? असा सवाल संतप्त पालक करत आहेत.

मंचर (तांबडेमळा) आगाराकडे फक्त १७ बस उपलब्ध आहेत. अनेक मुक्कामी बस या नारायणगाव आणि खेड आगाराकडू संचलित होतात. मंचर आगारामध्येप्रत्यक्षात २९ बसेसची आवश्यकता आहे. मंचर आगाराला महामंडळाकडू जर अधिक बसेस मिळाल्या तर प्रवाशांच्या सर्व समस्या दूर होऊ शकतील. - बालाजी सूर्यवंशी, आगार प्रमुख, मंचर



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.