Skip to main content

आंबेगाव तालुक्यात एसटी सेवेचा बोजवारा

समर्थ भारत वृत्तसेवा: 

मंचर ता. : सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून तांबडेमळा (अवसरी, ता. आंबेगाव) येथे एसटी आगार सुरू झाले. त्याचा मोठा गाजावाजा देखील करण्यात आला, मात्र याच एसटीमुळे तालुक्यातील विद्यार्थी, चाकरमाने आणि वृद्ध अक्षरशः वैतागून गेले आहेत. वेळेत एसटी बस सुटने, अचानक रद्द होणे, नादुरुस्त होणे आदी कारणांमुळे तालुक्यातील प्रवाशी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कारभारावर प्रचंड नाराज असून संबंधित अधिकारी आणि फक्त श्रेय घ्यायला पुढे येणाऱ्या नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहत आहेत. आंबेगाव तालुक्यात हजारो विद्यार्थी; शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी, चाकरमाने कामावर जाण्यासाठी, वृद्ध उपचारांसाठी आणि असंख्य नागरिक कुठल्या ना कुठल्या कारणाने एसटीने प्रवास करतात. मात्र हा एसटीचा प्रवास आता बिनाभरवशाचा झाला आहे. वेळेत सुटणाऱ्या एसटीमुळे विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जायला उशीर होतो, तर हातावर पोट असणाऱ्या चाकरमान्यांना उशिरा गेल्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार नादुरुस्त होणाऱ्या जुन्या खटारा गाड्यांमधून प्रवास करताना तालुक्यातील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

विद्यार्थ्यांना बिबट्याच्या हल्ल्याची भीती

मंचर आणि घोडेगाव येथे महाविद्यालयामध्ये ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी वेळे बस मिळत नाहीत, बऱ्याचदा मुक्कामी बस उशिरा येतात किंवा नादुरुस्त/ रद्द होतात. उशिरा निघाले ल्या बस रात्री उशिरा पोहोचतात. या बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्री अंधारात वाट शोधत आपले घर गाठावे लागते. आंबेगाव तालुका हे मोठे बिबट प्रमाण क्षेत्र असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन बिबट्या विद्यार्थ्यांना आपले भक्ष्य बनवू शकतो. या दर्घ टनांची जबाबदारी महाराष्ट्रराज्य मार्ग परिवहन महामंडळ घेणार का? असा सवाल संतप्त पालक करत आहेत.

मंचर (तांबडेमळा) आगाराकडे फक्त १७ बस उपलब्ध आहेत. अनेक मुक्कामी बस या नारायणगाव आणि खेड आगाराकडू संचलित होतात. मंचर आगारामध्येप्रत्यक्षात २९ बसेसची आवश्यकता आहे. मंचर आगाराला महामंडळाकडू जर अधिक बसेस मिळाल्या तर प्रवाशांच्या सर्व समस्या दूर होऊ शकतील. - बालाजी सूर्यवंशी, आगार प्रमुख, मंचर



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.