Skip to main content

घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा, जुगार, मटका अशा अवैध धंद्यांचा सुळसुळाट

समर्थ भारत वृत्तसेवा:

घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावांमध्ये खुलेआम सुरू असलेला मटका बंद  होणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे. ओपन जेवू देईना; क्लोज झोपू देईनाअशी मटका शौकिनांची अवस्था झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येऊ लागले आहेत. पोलिसांच्या तुंबड्याभरण्यासाठी? राजरोसपणे घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध मटका, जुगार, गांजा फोफावल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेतून होत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या मटक्याचा व्यवसाय थांबवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालावे अशी मागणी परिसरातील जनतेतून होत आहे.

घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी बाजारपेठ व व्यापारी उलाढाल मोठी असलेली अनेक सधन गावे आहेत. या गावात व्यवसायिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर सुरू असतात. गेल्या काही वर्षांपासून बंद झालेला मटका पुन्हा राजरोसपणे सुरु होऊन मटका घेणारे एजंट व खेळणाऱ्या मटका बहाद्दरांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार मटका राजरोसपणे सुरू असताना पोलीस किरकोळ कारवाई करत असतात व पुन्हा काही दिवसांनी मटका पुन्हा चालू होतो. मात्र पोलीस कायमस्वरूपी मटका बंदची कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

घोडेगाव पोलीस स्टेशनच्या अक्ष्यम दुर्लक्षामुळे मटका, जुगार, गांजा असे अवैध व्यवसाय फोफावल्याने आज अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. असे असतानाही या अवैध व्यवसायावर कुठल्याही प्रकारचे अंकुश लावण्यात येत नसल्याचे दिसत आहे.

काही वर्षांपूर्वीही मटक्याला असेच पेव फुटले होते पण मटका एजंट वरील वारवार झालेल्या कारवाई मुळे मटका क्लोजझाला होता, पण आता पुन्हा एकदा बंद झालेला मटका खुल्या व छुप्या पद्धतीने सुरू झालेला आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या मटक्याची साधी चाहूलसुध्दा पोलीसांना कशी लागत नाही, अशी चर्चा परिसरातील सर्वसामान्य नागरिक करत आहेत. त्यामुळे आता जिल्हा पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असणारे मटका, जुगार, गांजा कायमस्वरूपी बंद  करावेत व पोलिसांच्या खाबुगिरीला ही आळा घालावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहे.




 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.