Skip to main content

२५ वर्षीय विवाहितेचा घातपात, नातेवाईकांचा आरोप

मंचर प्रतिनिधी:



आंबेगाव तालुक्यातील बेलसरवाडी येथील २५ वर्षीय विवाहितेला लग्नात हुंडा दिला नाही म्हणून सासरच्या लोकांनी मानसिक व शारीरिक त्रास देत घातपात केल्याचा संशय विवाहितेच्या आईने केला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि,

मयत अनुष्का केतन गावडे वय २५ वर्ष रा. मंचर ता आंबेगाव जि पुणे. यांचा विवाह आरोपी 1)पती  केतन गुलाब गावडे, यांच्याशी १ एप्रिल २०२१ रोजी झाला होता विवाह झालेनंतर सुमारे तीन ते चार महीन्यांनतर ते दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी पर्यंत वेळोवेळी मौजे मंचर येथे तिचे पति केतन गुलाब गावडे, आरोपी गुलाब सखाराम गावडे(सासरे), आरोपी कल्पना गुलाब गावडे(सासु), आरोपी कांचन गुलाब गावडे(भाया), आरोपी शुभांगी कांचन गावडे(जाऊ) सर्व रा. मंचर ता. आंबेगाव, जि. पुणे, मुळ यांनी मुलगी अनुष्का हिला तुझ्या घरातील लोकांनी लग्नात आमचा मानपान निट केला नाही, हुंडा दिला नाही. तुला घरात निट स्वयंपाक येत नाही. कपडे धुता येत नाही, घरात झाडुन घेता येत नाही, तुझ्या माहेरून फोर व्हीलर गाडी घ्यायला पैसे घेवुन ये नाहीतर आमचे येथे राहायचे नाही असे म्हणुन वारंवार त्रास देवुन मुलगी अनुष्का हिचा गर्भपात केला आहे. तसेच मुलगी अनुष्का हिचेशी भांडणतंटा करून तिला मारहाण व शिवीगाळ दमदाटी करून तिला क्रुर वागणुक देवुन तिचा शारीरीक व मानसिक छळ करून तिचे मृत्युस कारणीभुत ठरले आहेत. 

२५ जानेवारी २०२४ रोजी सुमारे रात्री 10. 30 वाजताच्या सुमारास अनुष्का केतन गावडे हिचा मृत्यू झाला असून तिच्या सासरच्या लोकांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली आहे. म्हणुन फिर्यादी स्वाती अतुल बांगर यांनी मंचर पोलिस स्टेशन फिर्याद दाखल केली आहे. 

या घटनेचा पुढील तपास मंचर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि कांबऴे हे करत आहेत.




पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.