Skip to main content

आंबेगाव तालुक्यात दुर्गा ब्रिगेडची कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी मनीषा गावडे यांची निवड

समर्थ भारत वृत्तसेवा:  



महिलांना मोठ्या प्रमाणात गृहउद्योग तसेच टेक्निकल कपन्यांमध्ये अद्योगिक क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून महिलांचे सबलिकारण होण्यासाठी महिलांच्या न्याय हक्क, अन्याय या विरुद्ध लढण्यासाठी आंबेगाव तालुक्यात 'फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसियशनचे अध्यक्ष, मेट्रो रेल्वे चे ब्रँड ऍम्बसिडर छावा संघटनेचे अध्यक्ष अभयदादा भोर तसेच दुर्गाताई भोर यांच्या अध्यक्षतेखाली भोसरी या ठिकाणी नियुक्ती पत्र देऊन आंबेगाव तालुका दुर्गा ब्रिगेड कार्यकारणी जाहीर करण्यात आली. 


यावेळी अभय दादा भोर  यांनी महिलांना विविध  टेक्निकल कंपन्यानमध्ये भेट  देऊन  महिलांना कसा  रोजगार उपलब्ध  करून  देता येईल याचे  मार्गदर्शन केले व आंबेगावची  कार्यकारणी जाहीर केली त्यात अध्यक्षपदी  गावडेवाडीच्या आदर्श राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच मनीषा ताई संतोष गावडे यांची निवड झाली. तसेच उपाध्यक्ष पदी प्रमिलाताई टेमगिरे, सचिव वैशाली थोरात, खजिनदार पदी राणी शहाणे , सरचिटणीस प्रीती भालेराव, उपसरचिटणीस अश्विनी बागल,संघटक प्रमुख ज्योती येवले, संघटक प्रमुख अनिता भालेराव यांची नियुक्ती झाली. आंबेगाव तालुक्यात जास्तीत जास्त महिलांच्या हाताला काम देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महिलांच्या न्याय हक्कासाठी ही दुर्गा ब्रिगेड संघटना नेहमी प्रयत्न शील  राहील असे अध्यक्ष गावडे ताई यांनी यावेळी सांगितले.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.