Skip to main content

चपलेचा त्याग, कटिंग न करण्याचा निर्णय; दोन भावांचा मराठा मोर्चाला अनोखा पाठिंबा

समर्थ भारत वृत्तसेवा:



मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला घेऊन आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत असून ग्रामीण भागातील मराठा तरुण मोठ्या संख्येने यात सहभागी होत आंदोलनास पाठिंबा दर्शवत आहे. यात आंबेगाव तालुक्यातील धामणी गावच्या दोन सख्ख्या मावस भावांनी आनोखे आंदोलन करून मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दिला आहे.

आंबेगाव तालुक्यातील धामणी गावचे असणारे दोन सख्खे मावस भाऊ रंगनाथ जाधव आणि शांताराम जाधव यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी अनोखे आंदोलन करून पाठींबा दिला आहे. त्यातील रंगनाथ जाधव हे गेल्या तीन महिन्यांपासून चप्पल न घालता अनवाणी फिरून आंदोलनाला पाठींबा देत आहेत. तर शांताराम जाधव यांनी गेल्या चार महिन्यांपासून कटिंग आणि दाढी न करण्याचा पण केला असून जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हे आम्ही करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. या अनोख्या आंदोलनाची आता चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे.

मराठा आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सप्टेंबर महिन्यात धामणी येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणात देखील या दोन मावस भावांचा सक्रिय सहभाग होता. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही चप्पल आणि कटिंग, दाढी करणार नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

राज्यभरातल्या ग्रामीण भागतून मोठ्या संख्येने जरांगे पाटील यांना पाठिंबा मिळत आहे. ग्रामीण भागातील तरुणाई जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र, आंबेगाव तालुक्यातील या दोन सख्ख्या मावस भावांच्या हटके आंदोलनाची चर्चा होऊ लागली आहे.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.