Skip to main content

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाची आंबेगाव तालुका कार्यकारिणी जाहीर

समर्थ भारत वृत्तसेवा:



महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या आंबेगाव तालुकाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार संजय कोकणे, उपाध्यक्षपदी विजय कानसकर, धनंजय पोखरकर तर सचिवपदी राजेश चासकर यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. समीर राजे, मार्गदर्शक संदीप खळे यांच्या उपस्थितीत मंचर (ता. आंबेगाव) येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. 

यावेळी कार्याध्यक्षपदी किशोर वाघमारे, कोषाध्यक्षपदी स्वप्नील जाधव, संघटकपदी उत्तमराव टाव्हरे, समन्वयकपदी नितीन थोरात, संपर्क प्रमुखपदी दत्ता नेटके, प्रसिध्दी प्रमुखपदी समीर गोरडे, सह सचिवपदी आनंदराव नेटके आणि सह संपर्कप्रमुखपदी संतोष गावडे यांची देखील सर्वानुमते निवड करण्यात आली. 

यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष मनोज तळेकर, माजी उपाध्यक्ष विलास भोर, अमोल जाधव, अश्विनकुमार लोढा, नंदकुमार पोखरकर आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या माध्यमातून प्रतिभासंपन्न, निर्भीड, निष्पक्ष आणि व्यवस्था परिवर्तनाची आस असणाऱ्या पत्रकार बांधवांना संधी मिळत आहे. हे सुदृढ लोकशाहीसाठी अतिशय पोषक आहे. (संदीप खळे, मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ)

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ राज्यभरातील पत्रकार बांधवांसाठी सातत्याने आग्रही भूमिका घेत आले आहे. पत्रकार महासंघाने सातत्याने मागणी केलेल्या अनेक मुद्द्यांवर यंदाच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा घडवून आली हे या पत्रकार महासंघाचे मोठे यश आहे. (डॉ. समीर राजे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ)

आंबेगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी मला महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. मागील काळात आंबेगाव तालुक्यात पत्रकार बांधवांच्या बाबतीत काही गैरप्रकार झाले, जे अतिशय निंदनीय आहे. यापुढील काळात असे प्रकार झाल्यास कठोर प्रतिकार केला जाईल. (संजय कोकणे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ, आंबेगाव तालुका)


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.