Skip to main content

सर्पदंश झालेल्या व्यक्तींना मिळणार आर्थिक मदत

समर्थ भारत वृत्तसेवा:



सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत देण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन केंद्रीय वन विभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल यांनी सर्पदंशावरील उपाययोजनांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे, तसेच सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत देण्याचे निर्देश राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना दिले आहेत.


जुन्नर तालुक्यातील घोणसच्या सर्पदंशाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी बुधवारी (दि. 6) केंद्रीय वनमंत्री भुपेंद्र यादव आणि केंद्रीय वनविभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल याची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी कर्नाटक, ओरिसा, पंजाब, पश्‍चिम बंगाल, केरळ राज्यात सर्पदंशामुळे मृत्यू वा कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाते याकडे लक्ष वेधून महाराष्ट्रातही याच धर्तीवर आर्थिक मदत देण्याचे व उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

खासदार डॉ. कोल्हे यांच्या मागणीतील गांभीर्य ओळखून केंद्रीय वन विभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल यांनी तातडीने लक्ष घालून महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. जी. टेंभुर्णीकर यांना पत्र पाठवून सर्पदंशापासून स्थानिक ग्रामस्थांचे संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याच्या आणि सर्पदंश झालेल्या स्थानिक ग्रामस्थांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहे.

राज्यातील आमदारांनी आता सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारला त्वरीत कार्यवाही करण्यास भाग पाडावे, व राज्य सरकारनेही सर्पदंशामुळे मृत्यू वा कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत तसेच वैद्यकीय उपचार मोफत मिळावेत यासाठी तातडीने पावले उचलून जुन्नर तालुक्यात स्नेक बाईट केंद्र सुरु करण्याचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणीही खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.