Skip to main content

रूपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करा: संभाजी ब्रिगेड

समर्थ भारत वृत्तसेवा:


राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी बळीराजांचा अवमान करून धार्मिक भावना दुखविल्याबद्दल त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात निदर्शने करून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊन चाकणकरांविरूद्ध कारवाई करून पदमुक्त करण्याच्या मागणीचा भाग म्हणून पुण्यातही निदर्शने करण्यात आली.

रूपाली चाकणकरांनी १४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या स्वतःच्या अधिकृत फेसबुकवरून बहूजनांचा राजा बळीराजांच्या मस्तकावर वामनाने पाय दिल्याचा काल्पनिक फोटो पोस्ट केला होता. मुळात राज्यातला शेतकरी वर्ग महासम्राट बळीराजाला आपली अस्मीता मानतो. दिवाळी बलीप्रतिपदेच्या दिवशी शेतात बळीपुजन करतो. इतिहासात बळीराजाला वामन या आक्रमकाने कपटाने ठार मारले. हा प्रसंग महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या गुलामगीरी या ग्रंथात सिद्ध केला.

या पोस्टबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पोलीस प्रशासनावर दबाव टाकून प्रश्न विचारणारांवरच कारवाई करण्याचा प्रकार घडला आहे. संवैधानिक पदावर बसल्या असतांना चाकणकर यांनी महापुरूष बळीराजांचा वारसा नाकारत वामनाचे उदात्तीकरण केले. त्याचप्रमाणे प्रशासनाला खोटी माहिती देत सामाजिक संघटनेची व पदाधिकाऱ्याची नाहक बदनामी केली आहे. अशा असंवैधानिक पदाचा दुरूयोग करणाऱ्या चाकणकरांना पदमुक्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून केली आहे.

यावेळी 'इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो' अशा घोषणा देण्यात आल्या. तदनंतर रितसर निवेदन देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक प्रदिप कणसे सहसंघटक अशोक काकडे, विभागीय अध्यक्ष हर्षवर्धन मगदूम,जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे,पुणे शहराध्यक्ष प्रशांत कुंजीर,उपाध्यक्ष वैभव शिंदे, प्रशांत नरवडे,नागराज लावंड,गणेश कुंजीर,कैलास कणसे,राणाप्रेमजितसिंह पवार,प्रशांत तापकीर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.