Skip to main content

देवदत्त निकम यांच्या पाठोपाठ सहकार मंत्री वळसे पाटीलही नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

समर्थ भारत वृत्तसेवा



पेठ ता. २७ : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात काल दुपारी तीन ते पाच च्या दरम्यान अतिवृष्टी व गारपटीने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये कांदा, बटाटा, ज्वारी, हरभरा, लसूण, टोमॅटो आदी पिकांचा समावेश आहे. 

आज सकाळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देवदत्त निकम यांनी सकाळीच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करायला सुरुवात केली असून, त्यापाठोपाठ राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सातगाव पठारावरील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यात केली. 

यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, उपकार्यकारी अभियंता, मंडल कृषी अधिकारी, सरपंच मनीषा तोत्रे, उपसरपंच जितेंद्र तोत्रे, विकास बारवे, कैलास तोत्रे, पोलीस पाटील प्रगती तोत्रे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विष्णू हिंगे, संतोष धुमाळ, माऊली एरंडे, तलाठी माने, दत्तात्रय तोत्रे आदी उपस्थित होते.

दरम्यान शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सहकार मंत्री वळसे पाटील यांनी दिली. कालच्या पावसाने सातगाव पठारातील सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाकडून दोन दिवसात पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पूर्व आंबेगावातील वडगाव पीर, लोणी, धामणी, पोंदेवाडी, खडकवाडी तर सातगाव पठार भागातील पेठ, कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव आदी गावांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.




पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.