Skip to main content

अवकाळीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : आढळराव पाटील

 समर्थ भारत वृत्तसेवा


माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी प्रामुख्याने खडकवाडी, वाळुंजनगर, लोणी, धामणी, वडगाव पीर, कुरवंडी, कारेगाव या परिसरामध्ये गारपीट व अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होऊन झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व तहसीलदार संजय नागटिळक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. 


सदर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावे याबाबत सूचना केल्या. मुख्य म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात पीक घेतले असून सदर पंचनामे हे वस्तुस्थितीला आधारभूत मानून योग्यरित्या करण्यात यावे असे सांगितले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध भागात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊन झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झालेला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालय, मुंबई येथे भेट घेऊन तातडीने मदत मिळण्याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी आग्रही मागणी करणार असल्याचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी शेतकऱ्यांना सांगून आश्वस्त केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले, खडकवाडी गावचे सरपंच अनिल डोके व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.






पूर्व आंबेगावातील वडगाव पीर, लोणी, धामणी, पोंदेवाडी, खडकवाडी तर सातगाव पठार भागातील पेठ, कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव आदी गावांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.