Skip to main content

दुधाचा भाव घसरल्याने दूध उत्पादक अडचणीत

समर्थ भारत वृत्तसेवा 



निरगुडसर ता. १८ : पूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसायाकडे पाहत होता. मात्र, मध्यंतरी वाढलेल्या दरामुळे तरुण वर्गही दूध व्यवसायाकडे वळला आहे. मागील सोळा-सतरा महिन्यांपासून गाय व म्हशीच्या दूध दरात वाढ झाली होती. प्रतिकूल परिस्थितीमध्ये दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला होता. शिवाय स्थानिक पातळीवर वाढत्या दराची अंमलबजावणी झाल्याने त्याचाही फायदा झाला होता; मात्र पुन्हा दुधाचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे.


सणासुदीच्या तोंडावर दूध दरात दोन रुपयांनी घसरण झाली आहे. पशुखाद्याची दर वाढत असताना, दुधाला चांगली मागणी असतानाही दर कमी होत आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला दुधाला प्रति लिटर ३९ रुपये दर मिळाला होता. त्यामुळे तरुणाई दूध व्यवसायाकडे वळली. बँकेचे, पतसंस्थेचे कर्ज घेऊन, तरुण या व्यवसायात गुंतला आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका दुध दर कपातीमुळे बसणार आहे. नव्याने धंद्यात उतरलेल्या तरुण वर्ग कर्जाच्या विळख्यात अडकणार आहे.दुध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी असूनही गायीच्या दूध दरात कपात केल्याने संकट वाढले आहे.

प्रत्यक्षात दुधाला प्रतिलिटर उत्पादन खर्चाएवढादेखील दर सध्या मिळत नाही. दुधाचा लिटरमागे दहा रुपये दर वाढला असला तरी प्रतिलिटर उत्पादन खर्चाशी बरोबरी करत नसल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे. या काळात शेतकऱ्यांनी जगावे की मरावे, उत्पादन खर्च ५५ रुपये तर दुधाला मिळतात ३६ रुपये, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुपटीने तोटा सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. (दिपक पोखरकर, सरपंच, पिंपळगाव) 

दुधाच्या दरात अचानक मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा आर्थिक फटाका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटर ३५ रुपयांचा दर मिळत होता. मात्र, सध्या दुधाला प्रति लिटरसाठी २७ रुपयांचा दर मिळत आहे. शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय काहीच होणार नाही का? (हर्षद टाव्हरे, दुध उत्पादक शेतकरी)


 प्रचंड वाढलेली महागाई यामुळे त्रस्त झालेल्या गायदूध उत्पादक शेतकऱ्याला दूध दराचा मोठा फटका बसत आहे. गेल्या तीन महिन्यांत गाय दूध दर प्रतिलिटर पाच रुपये घसरले आहेत. तसेच दिवाळीला दूध दरात आणखी घसरण झाली आहे. त्यामुळे गाय दूध उत्पादकांची दीपावली कडू झाली आहे. ३४ रुपये दर देण्याचा सरकारी अध्यादेश दूध संथानी केराच्या टोपलीत टाकून मनमानी कारभार चालू केला आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने दूध दरात मोठी घसरण होत चालली आहे. मे, जून महिन्यात गाय दूध दराने ३८ रुपयांचा उच्चांक नोंदवला होता.यावेळी शासनाने अध्यादेश काढून गाय दूध दर कमीत कमी ३४ रुपयांपेक्षा कमी द्यायचा नाही, असे स्पष्ट केले. परंतु आदेश काढल्यापासून दूध दरात टप्प्याटप्याने घट होत गेली. जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत पाच रुपयांनी गाय दूध दर कमी झाले. तर दिवाळीत दरात आणखी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे गाय दूध उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. प्रचंड वाढलेले पशुखाद्याचे दर, चाऱ्याचे दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी आधीच अडचणीत आला आहे. त्यातच सातत्याने दरातील घसरण आर्थिक गणित बिघडून ठेवत आहे. (पवन हांडे देशमुख, दुध उत्पादक शेतकरी)



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.