Skip to main content

मा. खा. शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत?


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्यभरातील सगळ्याच पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. सत्तेत सहभागी असणाऱ्या अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभा मतदार संघावर दावा केल्याने शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.


लोकशाही या वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या एका वृत्तानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने लोकसभेच्या ९ जागांवर दावा केला असून, शिरूर लोकसभा मतदार संघाचाही यामध्ये समावेश आहे. काँग्रेस पक्षाच्या एका बड्या नेत्यासह शिवसेनेचे (शिंदे गट) मा. खा. शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मा. खा. शिवाजीराव आढळराव पाटील नॉट रीचेबल!

आगामी लोकसभा निवडणुकी या महायुतीत लढविल्या जाणार असून शिंदे गट, भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांतील जागावाटपात शिरूर लोकसभा मतदार संघ हा अजित पवार गटाकडे जाणार असल्याने आणि विद्यमान खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपसोबत जवळीक वाढल्याने? माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील राजकीय सोय म्हणून अजित पवार गटासोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा असून याबाबत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे फोन बंद असून ते मतदार संघात नसल्याचे समजते आहे. त्यांच्या लांडेवाडी येथील कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांनी सदर वृत्ताबाबत आपणास माहिती नसल्याचे सांगितले आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील हे पूर्वी विद्यमान सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत होते. ते सलग तीन वेळा खासदार राहिलेले असून पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिंदे गटात प्रवेश केला आणि आता अजित पवार गटात सहभागी होत असल्याच्या चर्चांना शिरूर लोकसभा मतदार संघासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.





पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.