Skip to main content

ऐन दिवाळीत एसटी बस बंद, प्रवाशांना सहन करावा लागतोय नाहक त्रास

मंचर प्रतिनिधी:

ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मनमानी कारभाराचा प्रवाशांना मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय.

दिवाळीच्या निमित्ताने सुट्ट्या असल्यामुळे लाखो प्रवाशी शहरातून आपल्या मूळ गावी प्रवास करत असतात. अनेक बहिणी आपल्या भावाला ओवाळायला भावाकडे जात असतात. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने गेले अनेक दिवस विविध मार्गांवरील बस नियमित वेळेत न सोडणे, बस नादुरुस्त असल्याचे सांगून अचानक रद्द करणे, बसच न सोडणे अशा अनेक गोष्टींमुळे प्रवाशांचे मोठे हाल होतायेत.

मागील वर्षी मोठा डामडौल करत एस टीची मोठी जाहिरात करून प्रवाशांविषयी मोठी आपुलकी दाखवत राज्य सरकारने मोठमोठ्या जाहिराती केल्या होत्या, मात्र या वर्षी राज्यभरात प्रवाशांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहेत.

आंबेगाव तालुक्यातील चास, नारोडी, साकोरे तसेच आदिवासी भागातील अनेक गावांमध्ये एस टी बसच्या नियमित फेऱ्यांना कात्री लावल्याने या परिसरात देखील प्रवाशांना तासंतास तिष्ठत उभे राहावे लागत असून शेवटी सोबत आणलेले ओझे घेऊन रिकाम्या हाताने घरचा रस्ता धरावा लागत आहे.

पुढाऱ्यांच्या हुजऱ्यांनी संपर्क केल्यावर एस टी प्रशासन कामाला

सर्वसामान्य प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाच्या मनमानी कारभाराचा फटका बसत असताना या सर्वसामान्य प्रवाशांनी एसटी प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अतिशय वागणूक दिली जाते. मात्र आम्हीच कसे जनतेचे कैवारी आहोत हे दाखविण्यात सतत मग्न असणाऱ्या पुढाऱ्यांचे आणि त्यांच्या हुजऱ्यांचे फोन उचलून होय बा करण्यात धन्यता मानून एसटी प्रशासन कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.