Skip to main content

लाखनगाव येथे वन्यजीव सुरक्षा सप्ताह संपन्न

लाखनगाव प्रतिनिधी:



शुक्रवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ रोजी लाखनगाव (ता. आंबेगाव) येथे वनविभाग, न्यू इंग्लिश स्कूल व जि प प्राथमीक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ, पदाधिकारीं या सर्वांसाठी वन्यजीव सुरक्षा सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते.

 याप्रसंगी वन्यजीवांचे अभ्यासक, रेस्क्यू टीम, जुन्नर वणविभागाच्या सदस्या व इको रेस्क्यू टीम दौंड च्या मेंबर शारदा दत्तात्रय राजगुरू यांनी वन्यजीव आपले वैरी नसून शेजारी आहेत, वन्यजीव बिबट्या हा आपल्या आजूबाजूला वावरणारा, राहणारा प्राणी आहे, त्याच्यापासून आपण आपली स्वतःची कशी काळजी घ्यावी? बिबट्याची काळजी कशी घ्यावी? बिबट्या पासून आपल्याला कोणते धोके होऊ शकतात?  बिबट्या माणसांवर हल्ला करतो का? बिबट्या प्राण्यांची शिकार कधी करतो? साधारण आपल्या परिसरात बिबट्यांची संख्या किती आहे? कोणत्या प्रवर्गातील बिबटे आहेत? साधारण बिबट्या माणसांची शिकार करतो का बिबट्या कोणत्या वेळेला शिकार करतो? अशी सखोल माहिती दिली. यावेळी बिबट्यांच्या संदर्भातल्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चित्रफिती दाखवण्यात आल्या 

याप्रसंगी कार्यक्रमासाठी वनरक्षक साईमाला गीते, प्रायमरी आणी माध्यमिक शाळा व्यवस्थापन समितीचे  अध्यक्ष  महादेव कानसकर, सोमनाथ पोंदे, सरपंच  प्राजक्ता रोडे, कल्पना बोहाडे, निसर्गाचे सखोल अभ्यासक व रेस्क्यू टीमचे मेंबर दत्तात्रेय राजगुरव, ग्रामसेविका शीला साबळे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल देसले,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय डोळस, रेस्क्यू टीमचे मेंबर व पत्रकार विजय कानसकर,अशोक जाधव, रामदास वळसे, महादेव दौंड, विकास खळे, अजय तळेकर दोन्ही शाळांचे सर्व शिक्षक, शिक्षिका व प्राथमिक माध्यमिक चे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी चर्चा सत्र, चित्रफीतींच्या माध्यमातून मार्गदर्शन करत वन्यजीव सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. दरम्यान इंग्लिश स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल देसले यांनी केले तर मुख्याध्यापक दत्तात्रय डोळस यांनी आभार मानले.

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.