Skip to main content

शिरदाळे गावतळ्यात मुबलक पाणी साठा

वळती प्रतिनिधी


गेल्या काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे शिरदाळे येथील गावतळे ७०% पेक्षा जास्त भरले असून परतीच्या पावसाने भविष्यातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. शिरदाळे गाव तसे डोंगरावर वसलेले कोरडवाहू शेती असलेलं गाव. डोंगराळ भाग असल्याने फक्त पावसावर अवलंबून असणारी शेती या ठिकाणी केली जाते. त्यात शाश्वत उत्पन्न नाही. बटाटा आणि ज्वारी ही येथील मुख्य पिके परंतु पावसाचे कमी जास्त प्रमाण यामुळे त्यांची शास्वती नसते. यावर्षी संपूर्ण पावसाळा कोरडा चालला होता तरी देखील बटाटा पीक यात टिकून होते परंतु गेल्या आठ दिवसात झालेल्या अतिपावसामुळे बटाटा पीक हातात आलेले गेले आहे. तर तलावात चांगला पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे निसर्ग हा कशी कृपा करेल सांगता येत नाही.


या पावसाने तलाव भरल्यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच यामुळे नळपाणीपुरवठा करताना उन्हाळ्यात अडचण येणार नाही आणि सर्वांना मुबलक पाणी देता येईल असे सरपंच जयश्री तांबे,उपसरपंच बिपीन चौधरी यांनी सांगितले. तर या पावसामुळे बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी मा.सरपंच मनोज तांबे,गणेश तांबे,मा.उपसरपंच मयुर सरडे यांनी केली आहे. 

सरकारच्या नियमानुसार ३३% नुकसान झाले तर नुकसानभरपाई मिळते तसेच ६५मिली पेक्षा जास्त पाऊस झाला तर त्या ठिकाणी प्रसंगासनाच्या वतीने पाहणी केली जाते परंतु पर्जन्यमापक हे पारगाव या ठिकाणी असून ते लोणी धामणी शिरदाळे परिसरपासून खूप लांब आहे त्यामुळे पर्जन्यमान मोजताना प्रत्यक्ष पाऊस कमी जास्त असतो आणि पर्जन्यमान हे पारगाव या ठिकाणावरून मोजले जाते. त्यामुळे लोणी धामणी या ठिकाणी एखादे पर्जन्यमापक बसवावे ज्याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होईल.

मयुर सरडे (मा.उपसरपंच शिरदाळे)



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...