Skip to main content

शिरदाळे गावतळ्यात मुबलक पाणी साठा

वळती प्रतिनिधी


गेल्या काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे शिरदाळे येथील गावतळे ७०% पेक्षा जास्त भरले असून परतीच्या पावसाने भविष्यातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. शिरदाळे गाव तसे डोंगरावर वसलेले कोरडवाहू शेती असलेलं गाव. डोंगराळ भाग असल्याने फक्त पावसावर अवलंबून असणारी शेती या ठिकाणी केली जाते. त्यात शाश्वत उत्पन्न नाही. बटाटा आणि ज्वारी ही येथील मुख्य पिके परंतु पावसाचे कमी जास्त प्रमाण यामुळे त्यांची शास्वती नसते. यावर्षी संपूर्ण पावसाळा कोरडा चालला होता तरी देखील बटाटा पीक यात टिकून होते परंतु गेल्या आठ दिवसात झालेल्या अतिपावसामुळे बटाटा पीक हातात आलेले गेले आहे. तर तलावात चांगला पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे निसर्ग हा कशी कृपा करेल सांगता येत नाही.


या पावसाने तलाव भरल्यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच यामुळे नळपाणीपुरवठा करताना उन्हाळ्यात अडचण येणार नाही आणि सर्वांना मुबलक पाणी देता येईल असे सरपंच जयश्री तांबे,उपसरपंच बिपीन चौधरी यांनी सांगितले. तर या पावसामुळे बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी मा.सरपंच मनोज तांबे,गणेश तांबे,मा.उपसरपंच मयुर सरडे यांनी केली आहे. 

सरकारच्या नियमानुसार ३३% नुकसान झाले तर नुकसानभरपाई मिळते तसेच ६५मिली पेक्षा जास्त पाऊस झाला तर त्या ठिकाणी प्रसंगासनाच्या वतीने पाहणी केली जाते परंतु पर्जन्यमापक हे पारगाव या ठिकाणी असून ते लोणी धामणी शिरदाळे परिसरपासून खूप लांब आहे त्यामुळे पर्जन्यमान मोजताना प्रत्यक्ष पाऊस कमी जास्त असतो आणि पर्जन्यमान हे पारगाव या ठिकाणावरून मोजले जाते. त्यामुळे लोणी धामणी या ठिकाणी एखादे पर्जन्यमापक बसवावे ज्याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होईल.

मयुर सरडे (मा.उपसरपंच शिरदाळे)



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.