Skip to main content

भागडी शाळेतील अष्टपैलू विद्यार्थी आर्यनला मिळाला ECA कडून लॅपटॉप

भागडी प्रतिनिधी:


आर्यन हा शारीरिक अपंग असून तो अभ्यासात हुशार तसेच खेळ संगणक व दैनंदिन जीवनातील सर्व कामे लीलया करतो त्याच्या व्यक्तिमत्व विकासात कुठेही हा विकलांगतेचा अडसर वाटत नाही.

शिक्षक बाळासाहेब गिलबिले यांनी आर्यन मधील शिकण्याची जिद्द पाहून त्याच्याविषयी पर्यावरण संवर्धन समिती environment conservation association संस्थेच्या अध्यक्षा विनिता दाते यांच्याशी संपर्क करून त्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी मदतीचे आवाहन केले त्याला प्रतिसाद म्हणून अध्यक्षांनी उत्तम दर्जाचा लॅपटॉप आर्यनला बक्षीस म्हणून दिला त्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी बालपणापासूनच संगणक व तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांनी भविष्यात स्वयंपूर्ण होताना प्रगतीच्या अतिउच्च शिखरावर असावे यासाठी ही छोटीशी मदत आहे असे त्या म्हणाल्या तसेच ECA च्या माध्यमातून ई वेस्ट रिसायकल साहित्याचा उपयोग जिल्हा परिषदेतील शाळा व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ते सातत्याने मदत करत असतात .दुर्गम भागातील अनेक शाळांना अभ्यासासाठी व शाळेसाठी स्वतंत्र सोलर किट बसविण्यात आलेले आहे.



आदर्श गाव भागडीचे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष नितीन आगळे, मोतीराम उंडे, ग्रामपंचायत सदस्य संदिप शिंदे, गणेश भालेराव, दत्ता बराटे, नूतन अध्यक्ष विष्णू उंडे,  रविंद्र आगळे, हनुमंत जाधव, विकास बराटे, आकाश आगळे, अश्विनी उंडे,  काशिनाथ उंडे, संभाजी गवारी,  प्रकाश आगळे, योगीता आगळे, मंदा आदक,  शाळा व्यवस्थापन समितीचे आजी-माजी सदस्य तसेच ग्रामस्थ शिक्षक लॅपटॉप प्रदान प्रसंगी उपस्थित होते .

आर्यनला उपस्थित ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या पर्यावरण संवर्धन समिती चे सामाजिक योगदानाबद्दल आभार मानले .

कार्यक्रमाचे नियोजन स्वाती शिंदे लालन गायकवाड आशा वाळके यांनी केले.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.