Skip to main content

मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी चार्ज घटनेच्या निषेधार्थ, मंचरला आंदोलन

मंचर प्रतिनिधी:



जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठी चार्ज केल्याच्या निषेधार्थ मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात अखिल भारतीय मराठा महासंघ, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांच्या भावना तीव्र होत्या.

राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे राज्य अध्यक्ष अँड सुनिल बांगर व अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुश लांडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी निषेध सभेचे आयोजन केले होते.

 घोषणा देत निषेध व्यक्त केला. यावेळी सुरेश निघोट, अजय घुले, मालती थोरात प्रवीण मोरडे, विकास जाधव, नीलिमा टेमगिरे अशोक काळे उपस्थित होते.

जालना येथे घडलेल्या घटनेबाबत निषेध व्यक्त करत असताना अँड. सुनिल बांगर यांनी राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली. ते म्हणाले शांतता मार्गाने न्याय हक्कासाठी मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षणासाठी कार्यकर्ते उपोषण करत होते. सदरचे उपोषण राज्य सरकारने पोलीस बळाच्या ताकदीवर चिरडण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी अमानुषपणे महिला, युवक-युवती, लहान मुले यांच्यावर लाठीहल्ला केला. पोलीस बांधवाना आदेश देणारे कोण? गृहखते कोणाच्या इशाऱ्यावर चालते हे राज्यातील जनतेला माहीत आहे. त्याची किंमत या सरकारला मोजावी लागेल.

जालना येथे लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे. अशी मागणी वसंतराव बाणखेले यांनी केली.

सरपंच संगिता शेवाळे, प्रभाकर बांगर, लांडे, वसंतराव बाणखेले, सुरेखा निघोट, राजू बेंडे यांची भाषणे झाली. मंचर पोलीस ठाणे, घोडेगाव पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय येथे मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलन शांततेत पार पडले. गणेश खानदेशे यांनी आभार मानले.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.