Skip to main content

ऐन गणेशोत्सवात मंचरकर अंधारात, वीज सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा

 मंचर प्रतिनिधी:


मंचर आणि परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

मंचर आणि परिसरातील गावात गणेशोत्सवाच्या सणात सतत दिवसा आणि रात्री वीज पुरवठा खंडित होत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर चार ते पाच तासानंतर पूर्ववत सुरू होतो; त्यामुळे गणेश भक्त, गृहिणी आणि व्यावसायिक हैराण झाले आहेत.

महावितरण कंपनीने त्वरित सुधारणा न केल्यास अधिकाऱ्यांना घेराव आणि रास्ता रोको करण्याचा इशारा महावितरण कंपनीच्या मंचर येथील अधिकाऱ्यांना मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

 बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी सतत विजेचा पुरवठा खंडित होत होता. मंचरमधील, मुख्य बाजार पेठेत, बाजार समितीच्या पूर्वेला व इतर वाड्यावस्त्यावरही गुरुवारी संध्याकाळी वीज पुरवठा खंडित झाला होता.

त्यानंतर सतत विजेचा लपंडाव सुरु होता. पिठाच्या गिरण्या बंद होत्या. घरगुती व काही मंडळांना गौरी गणपतीच्या आरत्या मेणबत्या लाऊन घ्याव्या लागल्या.असे मंचर शहर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संदीप उर्फ लक्ष्मण थोरात यांनी सांगितले.

महावितरण कंपनीच्या मंचर कार्यालयात अभियंता एस.बी राणे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. तातडीने सुरळीत वीज पुरवठा न केल्यास अधिकाऱ्यांना घेराव व रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.

शिष्ठमंडळात मंचर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुहास बाणखेले, थोरात, प्रवीण मोरडे, विकास बाणखेले, खलीद इनामदार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते होते. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

वीज पुरवठ्या अभावी अवसरी खुर्द येथील नळपाणी पुरवठा योजना बंद पडली; त्यामुळे महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी पाऊस सुरु असताना कसरत करावी लागली.अनेक व्यवसायिकांचे नुकसान झाले आहे.असे अवसरी खुर्द महात्मा गांधी तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष रामदास भोर यांनी सांगितले.

अनिलकुमार डोंगरे, उपकार्यकारी अभियंता महावितरण कंपनी मंचर

आदर्शगाव गावडेवाडी,भोरवाडी, लांडेवाडी. शेवाळवाडी, श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग,एकलहरे, पिंपळगाव येथेही विजेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काठापूर (ता.आंबेगाव) येथे अती पाऊस व विजा कोसळल्याने तेथील अति उच्चदाब उपकेंद्रातील केबल जळाली. तसेच अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वीज वाहिन्याही तुटल्या व खांबावरील विद्युतरोधक फुटले.

अश्या अनेक प्रसंगामुळे अखंडित वीज पुरवठा देता आला नाही. शुक्रवारी दुपारनंतर वीजपुरवठा पूर्ववत सुरु करण्यात महावितरणला यश आले आहे. नैसर्गिक संकटामुळे खंडित वीज पुरवठा झाल्याबद्दल दिलगीर आहोत.


 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.