Skip to main content

ऐन गणेशोत्सवात मंचरकर अंधारात, वीज सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा

 मंचर प्रतिनिधी:


मंचर आणि परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

मंचर आणि परिसरातील गावात गणेशोत्सवाच्या सणात सतत दिवसा आणि रात्री वीज पुरवठा खंडित होत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर चार ते पाच तासानंतर पूर्ववत सुरू होतो; त्यामुळे गणेश भक्त, गृहिणी आणि व्यावसायिक हैराण झाले आहेत.

महावितरण कंपनीने त्वरित सुधारणा न केल्यास अधिकाऱ्यांना घेराव आणि रास्ता रोको करण्याचा इशारा महावितरण कंपनीच्या मंचर येथील अधिकाऱ्यांना मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

 बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी सतत विजेचा पुरवठा खंडित होत होता. मंचरमधील, मुख्य बाजार पेठेत, बाजार समितीच्या पूर्वेला व इतर वाड्यावस्त्यावरही गुरुवारी संध्याकाळी वीज पुरवठा खंडित झाला होता.

त्यानंतर सतत विजेचा लपंडाव सुरु होता. पिठाच्या गिरण्या बंद होत्या. घरगुती व काही मंडळांना गौरी गणपतीच्या आरत्या मेणबत्या लाऊन घ्याव्या लागल्या.असे मंचर शहर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संदीप उर्फ लक्ष्मण थोरात यांनी सांगितले.

महावितरण कंपनीच्या मंचर कार्यालयात अभियंता एस.बी राणे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. तातडीने सुरळीत वीज पुरवठा न केल्यास अधिकाऱ्यांना घेराव व रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.

शिष्ठमंडळात मंचर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुहास बाणखेले, थोरात, प्रवीण मोरडे, विकास बाणखेले, खलीद इनामदार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते होते. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

वीज पुरवठ्या अभावी अवसरी खुर्द येथील नळपाणी पुरवठा योजना बंद पडली; त्यामुळे महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी पाऊस सुरु असताना कसरत करावी लागली.अनेक व्यवसायिकांचे नुकसान झाले आहे.असे अवसरी खुर्द महात्मा गांधी तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष रामदास भोर यांनी सांगितले.

अनिलकुमार डोंगरे, उपकार्यकारी अभियंता महावितरण कंपनी मंचर

आदर्शगाव गावडेवाडी,भोरवाडी, लांडेवाडी. शेवाळवाडी, श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग,एकलहरे, पिंपळगाव येथेही विजेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काठापूर (ता.आंबेगाव) येथे अती पाऊस व विजा कोसळल्याने तेथील अति उच्चदाब उपकेंद्रातील केबल जळाली. तसेच अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वीज वाहिन्याही तुटल्या व खांबावरील विद्युतरोधक फुटले.

अश्या अनेक प्रसंगामुळे अखंडित वीज पुरवठा देता आला नाही. शुक्रवारी दुपारनंतर वीजपुरवठा पूर्ववत सुरु करण्यात महावितरणला यश आले आहे. नैसर्गिक संकटामुळे खंडित वीज पुरवठा झाल्याबद्दल दिलगीर आहोत.


 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.