Skip to main content

टोमॅटोचे दर सत्तर रुपये किलो वरून सत्तर रुपये कॅरेटवर

कवठे येमाई, ता. १५ :



टोमॅटोचे दरात जबरदस्त घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. शासन मात्र सणासुदीच्या तोंडावर महागाई कमी झाल्याच्या अविर्भावात स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मशगुल आहे, परंतु सणासुदीला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र हिरावत आहे. पंधरा दिवसापूर्वी टोमॅटोला चांगला भाव मिळत होता. परंतु तो आता शेतकऱ्यांना कवडीमोल दराने विकावा लागत आहे,

त्यात त्याचा उत्पादन खर्च सुद्धा भागत नाही. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. मागील काही दिवसात टोमॅटोची आवक कमी असल्यामुळे टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. परंतु जशी आवक वाढत चालली तसे टोमॅटोचे बाजारभाव कोसळत चालले आहेत. काही दिवसापूर्वी सत्तर रुपये किलो दराने विकले जाणारे टोमॅटो सत्तर रुपये कॅरेट पर्यंत खाली आले आहेत. शेतकऱ्यांनी जगावे का मरावे हा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

त्यामुळेच शेतकरी आत्महत्या का करणार नाहीत असा प्रश्न विचारला जात आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी नारायण पळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन हजार रोपे लावण्यासाठी उत्पादन खर्चामध्ये तार, बांबु, मशागत, लागवड,

खते, खुरपणी, तोडणी, औषधे हा सर्व खर्च ८० हजार ते १ लाखापर्यंत खर्च जातो. हा सर्व खर्च कुठून तरी कर्ज घेऊनच करावा लागतो. हा उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने पदरात काहीच पडत नाही. मी टोमॅटोची शेती करत आहे, सद्या माझी तोडणी चालू आहे, माझे टोमॅटो मी नारायणगाव मार्केटला पाठवतो. परंतु सध्या मला फक्त सत्तर रुपये कॅ रेटला बाजार मिळत आहे.

एका कॅ रेटला वाहतूक खर्च चौतीस रुपये येतो, मिळणारी उर्वरित रक्कम तोडणी मजदर यांच् ु यावरच खर्च के ली जाते, त्यामुळे पदरात काहीच मिळत नाही. या पडत्या काळात शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी.

- पवन जाधव,

टोमॅटो उत्पादक शेतकरी



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.