Skip to main content

जागृती महाजन यांना कलाकुंज राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार

मंचर प्रतिनिधी:



नाशिक येथील कलाकुंज 24 तास न्यूज चॅनेल तसेच द. बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात शैक्षणिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा  कलाकुंज शिक्षक रत्न पुरस्कार देऊन कालिदास कला मंदिर नाट्यगृह नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.



या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्री मा भारती ताई पवार व सिने अभिनेत्री स्मिता प्रभू   हे होते.  संपादक डॉ. महेंद्र देशपांडे,माननीय दीपक रत्नाकर दीक्षित(आचार्य गणू महाराज प,ग्राम पुरोहित)मा सुनील पाटील (नायब पोलीस अधीक्षक),डॉक्टर राज नगरकर (कर्करोग तज्ञ), प्रा. डॉ.शोभाताई सातभाई (ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेविका), सामाजिक व राजकीय क्षेत्रातील इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मंचरच्या जागृती महाजन यांनी गेल्या 14 वर्षांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल येथे कार्यरत असताना. अध्यापन काळात  त्यांच्या विषयाचा इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल , तालुकास्तर तसेच जिल्हास्तर पुरस्कार प्राप्त नाटिकांचे लेखन, दिग्दर्शन,राबविलेले समाज उपयोगी उपक्रम, शैक्षणिक सामाजिक व राजकीय कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, शब्दांकुर काव्यसंग्रहाचे लेखन,  तालुक्यातील पहिली महिला निवेदिका, सामाजिक व राजकीय क्षेत्रात असणारे योगदान. आंबेगाव वार्ता वृत्त निवेदिका तसेच कोरोना काळात 'शोध उत्कृष्ट अध्यापकाचा 'या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त, विद्यार्थ्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध या सर्व मुद्द्यांचा विचार करून. कलाकुंज सन्मान सोहळा 2023 मध्ये जागृती महाजन.यांना राष्ट्रीय कलाकुंज शिक्षक रत्न पुरस्कार सन्मानचिन्ह व  प्रमाणपत्र्  देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या उज्वल यशाबद्दल विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.