Skip to main content

फासेपारधी समाजाचा धडक मोर्चा थेट तहसील कार्यलयावर

घोडेगाव प्रतिनिधी:


 ९ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यानंतर ७५ वर्ष होऊनही मुलभूत सुविधा, राज्य घटनेने दिलेल्या अधिकारापासून वंचित राहुन आज शासनदरबारी दाद मागण्यासाठी घोडेगाव येथे घोडेगाव येथील तहसील कार्यालयावर मोर्चा चे आयोजन करून निवेदन देण्यात आले.

यावेळी जि.प.अध्यक्ष आदिवासी नेते देवराम लांडे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी उपजिल्हासंघटक कलावती पोटकुले, तालुका संघटक प्रा.सुरेखा निघोट फासेपारधी समाजाचे नेते नामदेव भोसले ,महिपत भोसले, रेश्मा भोसले, कलावती भोसले,शारदा भोसले,चलाख भोसले, बलवार पवार, सचिन भोसले,चान्स भोसले फासेपारधी समाजा शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना नामदेव भोसले यांनी फासेपारधी समाजाला, जातीचे दाखले मिळत नसल्याने उच्च शिक्षणापासून मुले वंचित रहात असुन शिष्यवृत्ती नसल्याने शाळा महाविद्यालयांचे महागडे शिक्षण परवडत नसल्याने शिक्षण सोडून द्यावे लागत असल्याने प्रगती खुंटली आहे, स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे झाली तरी आजही हा समाज भौतिक सुविधांपासून वंचित असुन,झोपडी-पालात रहात आहे, वीजेची आरोग्य, दळणवळणाची आणि घरकुलासाठी जागा शासनाने द्यावी ,अशी मागणी करतानाच गुन्हेगारीचा शिक्का असल्यासारखे पोलिस त्रास देत असुन यातुन समाजाची सुटका करावी अशी मागणी केली.


यावेळी बोलताना देवराम लांडे यांनी शासनाने विकासापासून कोसोदुर असलेल्या अजुनही झोपडीत सर्व सोयींपासुन दूर असलेल्या फासेपारधी समाजाच्या घरकुल,जातीचा दाखला देण्यास अधिकारी वर्गाने प्राधान्यक्रम देऊन, समस्या सोडवाव्यात अन्यथा यापेक्षा ऊग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कलावती पोटकुले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कायमच वंचित घटकांच्या मागे असुन समाजातील काळे हा युवक होमगार्ड, काही पोलिस म्हणूनही कार्यरत आहेत त्यासाठी प्रयत्न केले असे सांगितले

तर प्रा.सुरेखा निघोट यांनी शिवसेना पक्ष फासेपारधी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आज व इथून पुढेही रस्त्यावर उतरणार असुन या मागण्यांची शासनदरबारी दखल घेईपर्यंत बरोबरच रहाणार असे उपस्थित समाजास सांगुन शासनाने या पायाभूत सुविधांपासून वंचित समाजाच्या प्रगती, विकासासाठी योजनाबद्ध कार्यक्रम व निधी द्यावा व विशेष शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करून सर्वांना रेशनकार्ड, आधार कार्ड,जातीचा दाखला, घरकुल व त्यासाठी जागेची मंजुरी देऊन,हातावर पोट असलेल्या लोकांना उपजिविकेचं साधन नसल्याने प्रशिक्षण व कर्ज रुपाने मदत करुन मुख्य प्रवाहात आणावे अशी मागणी केली.

याप्रसंगी फासेपारधी समाजाचे लोक, महिला लहान मुलांसह संपूर्ण आंबेगाव तालुका, पुणे जिल्ह्यातुन उपस्थित होते, शासनाने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी जोरदार घोषणाबाजी,या मोर्चात झाली.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.