Skip to main content

पारगाव कारखाना पोलीस स्टेशन हद्दीतील भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनमध्ये जमा करा- लहु थाटे

 पारगाव प्रतिनिधी:


पुण्यात तीन दहशतवादी मिळून आल्यामुळे पुणे शहर पोलीस व ग्रामीण पोलीस पुणे अॅक्शन मोडवर आले असून भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन पोलिस स्टेशन करत आहे.

पुणे पोलिसांनी दहशतवादी पकडल्यानंतर त्यांच्याकडून रोज धक्कादायक खुलासे पुढे येत होते. तसेच ते नाव बदलून पुण्यात राहत असल्याचेही निदर्शनास आले आहे. ज्या ठिकाणी ते राहत होते. त्या ठिकाणी भाडेकराराची कायदेशीर प्रक्रिया करण्यात आलेली नव्हती. भाडेकरूची माहिती न ठेवल्यामुळे काही समाजकंटक त्याचा फायदा उठवत आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पारगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील घर, फ्लॅट, जागा, गोडाऊन, दुकानदार तसेच छोट्या मोठ्या कंपनी मालक, कॉन्ट्रॅक्टर व इतर मिळकतदाराने भाडेकरू ठेवताना भाडेकरूच्या चारित्र्य प्रमाणपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून घ्यावेत. त्याची माहिती पोलिसांना वेळेत सादर करावी. सुरक्षेच्या दृष्टीने हे गरजेचे आहे. गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष व सचिव यांनी भाडेकरूचे पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय भाडेकरूला गृहनिर्माण संस्थेत प्रवेश देऊ नये. तसा प्रवेश दिल्यास प्रचलित कायद्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. भाडेकरूचे ऑनलाइन व्हेरिफिकेशन केल्यास घरमालकाने त्याची एक प्रत पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे.

 दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्यानंतर भाडेकरूची माहिती ठेवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरात प्रशासकीय पातळीवरून देखील माहिती सादर करण्याचे आवाहन केले जात आहे.

भाडेकरारासह भाडेकरुची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला जमा करण्याचे आवाहन करत आहोत. भाडेकरूची व कामगारांची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित मालकांवर कायदेशीर व कडक कारवाई करण्यात येईल. असे अवाहन पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक लहु थाटे यांनी केले आहे.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.