Skip to main content

ज्या गावात एस.टी.जाते ती गावे विकसित झालेली आहेत.त्या मूळे एस.टी.सेवा अखंडपणे सुरू रहावी-शिवसेना पुणे जिल्हा संघटक ॲड.अविनाश रहाणे

मंचर प्रतिनिधी:



महाराष्ट्र राज्यातील ज्या गावात एस.टी.जाते ती गावे विकसित झालेली आहेत.त्या मूळे एस.टी.सेवा अखंडपणे सुरू रहावी यासाठी राज्य सरकारने शर्थीचे प्रयत्न करावेत असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे जिल्हा संघटक ॲड.अविनाश रहाणे यांनी केले आहे.

सद्यस्थितीत केन्द्र सरकार व राज्य सरकार सर्व सार्वजनिक उद्योग, सेवा व संस्थांचे खाजगीकरण करण्याचा धडाका लावला आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन करून आधीच चार कंपन्या निर्माण केल्या आहेत.आता या विज कंपन्या देखील एका अडाणी उद्योगपतीला विकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.हा डाव सर्वांनी मिळून हाणून पाडला पाहिजे.उर्जा विभाग उद्योगपती ने खरेदी केल्यास त्याच्या फायद्या साठी तो त्याला जास्त लाभ होण्यासाठी वाटेल त्या दराने वीज पुरवठा करील.अधिकारी, कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने भरती केले जाईल, त्यांना पेन्शन मिळणार नाही.यामुळे या खाजगीकरणाच्या धोरणाला कडाडून विरोध व्हायला हवा. 

राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या मुक्कामाच्या ठिकाणी मिळतील त्या प्रवाशांना घेऊन दिलेल्या वेळेत पोहचतात.महा मंडळ फायदा तोट्याचा विचार न करता केवळ जनतेच्या सेवेसाठी एस.टी.वहातुक करते.या उलट खाजगी वहातुकदार फक्त फायदा होतो तेथेच वहातुक करतात.प्रवासी कमी असतील, रस्ता खराब असेल तर खाजगी वहातुकदार प्रवासी घेणे टाळू शकतो.मात्र एस.टी.गाड्याचे तसे नाही.दुर्गम ठिकाणी जेथे दुरध्वनी सेवा देखील उपलब्ध नाही.त्या ठिकाणी एस.टी.पोहोचते. आंबेगाव तालुक्यात ९ वर्षांपूर्वी घडलेली भुस्कलनाची दुर्दैवी घटना केवळ मुक्कामी गेलेल्या एस.टी.मुळेच सर्वांना समजली व अनेकांचे जीव वाचले.ज्या गावापर्यंत एस.टी.जाते त्या गावांचा विकास झालेला आपल्याला पहायला मिळतो.म्हणून कुठल्याही परिस्थितीत एस.टी.चे खाजगीकरण होऊ न देता ही सरकारी सेवा सुरू रहायला हवी.ही सेवा सुरू असताना प्रवाशांना सवलतींची खैरात वाटल्याची जाहिरात करण्यात येत आहे.प्रत्यक्षात प्रवाशांना सवलतीं मिळत नाही आणि महामंडळ देखील फायद्यात दिसत नाही.एस.टी.फायद्यात आणायची असेल तर चालक आणि वाहक यांना प्रवाशा मागे इन्सेन्टीव्ह देण्यासारखे पर्याय शोधावे जेणेकरून प्रवाशांना सेवा ही मिळेल, कर्मचाऱ्यांना सेवा केल्याचे समाधान मिळेल आणि महामंडळ ही नफ्यात येईल.या सर्व गोष्टींचा विचार व्हावा.

महावितरण,एस.टी.वहातुक या बरोबरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याही तितक्याच महत्वाच्या आहेत. श्रीमंतांची मुले महागडी फी भरून खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकतात मात्र गोरगरिबांची, शेतकरी, शेतमजूर, रोजंदारी कामगार यांच्या मुलांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाय शिक्षणासाठी पर्याय नाही.अनेक दुर्गम भागात कमी विद्यार्थी संख्या असली तरी तिथे सक्तीने शिक्षक आपली जबाबदारी पार पाडत आहेत.तेच खाजगी संस्था ही सेवा कमी आर्थिक फायदा होईल म्हणून तेथे सेवा पुरवत नाहीत. एकंदर एस.टी. महामंडळ,विज वितरण कंपनी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचे खाजगीकरण होऊ न देता या सरकारी सेवा अखंडपणे सुरू राहिल्या पाहिजेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे जिल्हा संघटक ॲड.अविनाश रहाणे यांनी सांगितले.







पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.