Skip to main content

रक्षाबंधनसाठी भावाकडे गेलेल्या महिलेचे सव्वा लाखाचे दागिने लंपास

समर्थ भारत वृत्तसेवा:



मंचर ता. ३० : मंचर (ता. आंबेगाव) येथील गांजाळे मळ्यात राहणाऱ्या संध्या गांजाळे या मंगळवारी (दि. २९) रक्षाबंधनच्या निमित्ताने थिगळस्थळ (राजगुरूनगर) येथे गेल्या होत्या. रक्षाबंधन झाल्यानंतर बुधवारी (दि. ३०) पुन्हा सासरी येत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेत असणाऱ्या तब्बल सव्वा लाखाचे दागिन्यांची चोरी केली आहे. याबाबत त्यांनी मंचर पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दिली आहे.

संध्या गांजाळे (वय ४२, मंचर ता. आंबेगाव जि.पुणे) आपल्या सासरी परतत असताना, राजगुरूनगर येथून निघालेल्या बसने मंचर स्थानकावर उतरल्या. त्यानंतर घरी गेल्यावर त्यांना आपल्या पिशवीत ठेवलेल्या दागिन्यांची चोरी झाल्याचे समजले. त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह दागिन्यांची शोधाशोध करुनही दागिने सापडले नाहीत, म्हणून त्यांनी मंचर पोलीस ठाण्यात याविषयी करायदेशिर तक्रार दिली आहे. चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये १० ग्रॅम वजनाचा अंदाजे ५० हजार रुपयांचा लक्ष्मीहार आणि १५ ग्रॅम वजनाचे अंदाजे ७५ हजार रुपयांचे नेकलेस आहे.

दरम्यान मंचर पोलिसांनी काही संशयित महिला आरोपींना ताब्यात घेतले असून; या महिला बस स्थानक परिसरात संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या असून; बस स्थानक परिसरातील होणाऱ्या चोऱ्यांमध्ये त्यांचा काही सहभाग आहे का या बाबत पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.