Skip to main content

महावितरण शाळकरी मुलांच्या अपघाताची वाट पाहतंय का : स्वप्नील बेंडे

समर्थ भारत वृत्तसेवा

मंचर, ता. १९ : मंचर येथील अमरनाथ हाईटस लगत महावितरण कंपनीच्या दोन डी.पी. असून; आता अजून एका डी.पीच्या उभारणीचे काम सुरु आहे. या तिन्ही डी.पी.साठी महावितरण कंपनीच्या मंचर सुपर मार्केट मागील डी.पी. पासून ११ केव्हीच्या भूमिगत केबलने वीज पुरवठा प्रस्तावित आहे. या कामातील केबल अनेक ठिकाणी उघड्यावर असल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे.

सदर केबल्स अनेक ठिकाणी उघड्यावर असल्याने तसेच निर्धारित खोलीपर्यंत योग्य काळजी घेऊन न गाड्ल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली असून; महावितरण कंपनी शाळकरी मुलांच्या अपघाताची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल मंचर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि युवा नेते स्वप्नील बेंडे यांनी केला असून कंपनीने वेळीच योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी देखील केली आहे.

सदर वीजपुरवठा करतेवेळी खोलवर गाडून पाईप मध्ये केबल टाकून काम करण्याऐवजी जमिनीपासून सुमारे अर्धा फुट खोलवर कोणत्याही पाईप मधून ही केबल टाकलेली नाही. सदर केबल खोलवर न गाड्ल्यामुळे मंचर नगरपंचायच्या वतीने सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाच्या दरम्यान दोन वेळा या  केबलला जे.सी.बी.च्या बकेटचा धक्का लागून केबल खराब होऊन येथील रहिवाश्यांना ऐन मोहरमच्या दिवशी अंधारात राहावे लागले होते. 

या केबल मधून होणारा विजेचा प्रवाह हा ११ के.व्ही. इतका जास्त असल्याने मोठा अनर्थ होऊ शकतो. याबाबत नगरपंचायत आणि ग्रामस्थांनी महावितरण कंपनीकडे लेखी पाठपुरावा करूनही अध्याप सदर भूमिगत वीजवाहिनीची केबल खोलवर पाईप मध्ये पुरून टाकण्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही.

शाळकरी मुलांसह नागरिकांना धोका

मंचर सुपर मार्केटमागील रस्त्यावर जवपास २०० मीटर उघडयावर ही केबल आहे. या केबल वरून सर्व दुचाकी व चारचाकी ये जा करतात. तसेच जवळपास ५०० रहिवाशी आजूबाजूला राहतात. जिल्हा परिषद शाळा शेजारी असल्यामुळे शाळेतील लहान मुले त्या रस्त्याने ये जा करत असतात. गावात येण्यासाठी तो रस्ता असल्यामुळे दररोज दोन ते तीन हजार लोकांची रस्त्यावरून ये- जा सुरु असल्याने मोठा अपघात होऊ शकतो.  या गोष्टीची कल्पना असूनही पूर्वीचा कंत्राटदार आणि महावितरण कंपनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित कंत्राटदाराने आणि महावितरण कंपनीने लवकरात लवकर काम सदर उघडयावरील असणारी वीज वाहिनीची केबल पाईपमधून खोलवर पुरून काम पूर्ण करून द्यावी. या परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या आणि शाळकरी मुलांच्या आरोग्याशी संबंधित कंत्राटदाराने आणि महावितरण कंपनीने चालविलेला खेळ त्वरित थांबवावा. सदर काम निर्धारित वेळेत पूर्ण करून द्यावे अन्यथा महावितरण आणि संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात मोठे आंदोलन छेडण्यात येईल. (स्वप्नील बेंडे, मा. सदस्य, मंचर ग्रामपंचायत)



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.