Skip to main content

साडेचार लाख रूपयांचे देवांचे दागिने चोरी करणाऱ्या चोरट्यांना केले गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जुन्नर प्रतिनिधी:




बत्तीस गुन्हे दाखल असलेली त्याचबरोबर मंदिर चोरीचे गुन्हे करणारी आंतरजिल्हा टोळी म्होरक्यासह ताब्यात, सुमारे साडेचार लाख रूपयांचे मंदिरातील देवांचे दागिने केले हस्तगत जुन्नर-खेड विभागातील मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी मार्गदर्शन करून एक पथक नेमले होते.



स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंदिर चोरीतील गुन्हयाच्या  घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून बातमीदारामार्फत आरोपींची ओळख पटविली. गुन्हयातील चोरटे हे सराईत असून वेगवेगळया जिल्हयाचे रेकॉर्डवरील आहेत अशी माहिती बातमीदारामार्फत मिळाल्याने आरोपींचा शोध घेत असताना दि १४ऑगस्ट२०२३ रोजी टोळीचा म्होरक्या १) भास्कर खेमा पथवे वय ४६ वर्षे रा. नांदुर दुमाला ता संगमनेर जि अहमदनगर यास घोडेगाव परीसरातून पथकाने ताब्यात घेतले. त्याचे कडील चौकशीत त्याने जुन्नर, मंचर, कान्हूर मेसाई, लेण्याद्री येथील मंदिरात त्याचा साथीदार २) सोमनाथ शिवाजी भुतांबरे वय २४ वर्षे, रा. समशेरपुर ता अकोले जि अहमदनगर याचे मदतीने केले असून चोरीचे चांदीचे दागिने ३) राजेंद्र रघुनाथ कपिले वय ६२ वर्षे, रा संगमनेर ता संगमनेर जि अहमदनगर यास विक्री केले असल्याचे सांगितले असता त्यास ताब्यात घेवून मंदिर चोरीतील पाच किलो ग्रॅम वजनाची चांदीची गणपतीची मुर्ती सह एकूण सहा किलो सातशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने रू.४,६७,०००/- किंमतीचे हस्तगत करण्यात आलेले आहेत. आरोपी सोमनाथ भुतांबरे यास लेण्याद्री फाटा, जुन्नर येथून बातमीचे आधारे ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून पुणे ग्रामीण जिल्हयातील एकूण चार गुन्हे उघडकीस आले असून अहमदनगर व नाशिक जिल्हयातील मंदिर घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचे आरोपींनी सांगितले आहे. आरोपी कडुन उघडकीस आलेले गुन्हे

 

१) जुन्नर पोस्टे गुरनं ३२७/२०२३ भादंवि ४५७,३८० २) जुन्नर पोस्टे गुरनं १६०/२०२३ भादंवि ४५७,३८०

 

३) शिक्रापूर पोस्टे गुरनं ७१३/२०२३ भादंवि ३७९ ४) मंचर पोस्टे गुरनं २८८ / २०२३ भादंवि ३७९

 

मंदिराबाबत नागरीकांच्या धार्मिक भावना व श्रद्धा जोडलेली असून जुन्नर शहरातील ग्रामदैवत असलेले गणेश

 मंदिरात दररोज हजारो नागरीक श्रद्धेने दर्शनास येत असतात. अष्टविनायकापैकी एक असलेले लेण्याद्री मंदिरातील गिरीजात्मज गणपती मंदिरात लाखो भाविक राज्यातून दर्शनासाठी येत असतात. कान्हुर मेसाई येथील जागृत देवस्थान असलेले कुलदेवी मेसाई देवीचे मंदिरात वर्षभर भाविक दर्शनाला येतात. आणि नवरात्र उत्सव मोठया प्रमाणात साजरा होतो आणि नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. मंचर जाधववाडी परीसरातील तुकाई माता मंदिरात देखील पंचक्रोशीतील नागरीक दर्शनासाठी जात असून नवरात्र उत्सव थाटामाटात साजरा केला जातो.



 


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.