Skip to main content

धरणात बुडालेल्या मच्छीमाराचा मृतदेह मिळाला

 जुन्नर प्रतिनिधी:



 मासेमारी करण्यासाठी माणिकडोह धरणाच्या (ता. जुन्नर) जलाशयात गेलेल्या आदिवासी ठाकर समाजातील कैलास शंकर जाधव (वय ४५, रा. खामगाव-शिवेचीवाडी, ता. जुन्नर) यांचा मृतदेह तीन दिवसानंतर शुक्रवारी (ता. २१) सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आला.
कैलास जाधव हे मंगळवारी सायंकाळपासून बेपत्ता होते. त्यांचे कपडे, चप्पल काठावर आढळून आले होते, तर मासेमारीसाठीची रबरी ट्यूब पाण्यावर तरंगत होती. त्यामुळे ते पाण्यात बुडाल्याची शंका व्यक्त होत होती. खामगावचे उपसरपंच अजिंक्य घोलप यांनी पोलिस, तहसील जलसंपदा, तसेच आपत्कालीन विभागास याबाबत माहिती दिली होती. स्थानिक रेस्क्यू पथक व ग्रामस्थांनी दोन दिवस पाण्यात गळ टाकून शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. 

घटनास्थळी तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी भेट दिली होती. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी पाणबुडीच्या साहाय्याने शोघ घेण्याची मागणी केली होती. मात्र, तीन दिवसानंतर शुक्रवारी जाधव यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
दरम्यान, तालुक्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात बुडाल्याच्या घटना वारंवार घडतात यासाठी अत्याधुनिक आपत्कालीन व्यवस्था तालुक्यात असावी, अशी मागणी अजिंक्य घोलप यांनी प्रशासनाकडे केली आहे.
अंत्यसंस्कारानंतर दिला पेपर मृत कैलास जाधव यांचा मुलगा सूरज हा महाविद्यालयात शिक्षण घेत असून, शुक्रवारी सकाळी वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याने आपले दुःख बाजूला ठेवत कला शाखेच्या तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेचा पेपरही दिला.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.