Skip to main content

सातगाव पठार भागातील पाणी आणि सिलिंगच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा ठिय्या

समर्थ भारत वृत्तसेवा

पेठ (दिलीप धुमाळ)



खेड, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील कोरडवाहू गावांना वरदान ठरणाऱ्या कलमोडी प्रकल्पाला गती मिळण्यासाठी, सातगाव पठार भागातील सिलिंग हटवण्यासाठी तसेच हुतात्मा बाबू गेनु जलाशयातील (दिंभे धरणातील) जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्याच्या हक्काचे पाणी बोगद्याद्वारे थेट नगर जिल्ह्यात घेऊन जाण्याच्या शासन निर्णयाविरोधात सातगाव पठार व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आज (दि. १८) पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पंचवटी ढाबा, पेठ येथे शिवसेना गट नेते देविदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 



उपस्थित शेतकऱ्यांना रविंद्र तोत्रे, ग्रामपंचयत सदस्य संजय पवळे अशोक धुमाळ, भाऊ सावंत, संजय कराळे, अशोक राक्षे, मोहन काळे, बी.आ. कराळे, गणपतराव  कराळे, मोहन काळे, प्रशांत पवार इत्यादी कार्यकर्त्यांनी ३५ वर्ष सातगाव पठार भागाला कलमोडी पाणी मिळालं नाही तसेच सातगाव भागातील जमिनींना सिलिंग असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडीअडचणीचा सामना करावा लागतो या विषयावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 

शेवटी शिवसेचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या. आता जर न्याय मिळाला नाही तर; यापुढे कलमोडी धरणामध्ये जलसमाधी घेऊ. असा इशारा शासनाला दिला. यावेळी नायब तहसीलदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे, घोडेगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, आणि अन्य पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली साठ पोलीस कर्मचारी, सातगाव पठार भागातील सर्व पोलीस पाटील यांचा चोख बंदोबस्त ठेवला.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.