Skip to main content

सर्पदंश झाल्यास रुग्णास मांत्रिकाकडे अथवा मंदिरात नेऊ नये - डॉ. सदानंद राऊत

घोडेगाव प्रतिनिधी:



सर्पदंश झाल्यास रुग्णास मांत्रिकाकडे अथवा मंदिरात नेऊ नये, अघोरी उपायांमुळे सर्पदंशाचा रुग्ण दगावू शकतो. त्यास धीर देऊन त्वरित जवळच्या रुग्णालयात न्यावे,’ असे आवाहन सर्पदंशतज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी केले.

घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत इंग्रजी माध्यमाची शासकीय आश्रमशाळेत न्यूक्लीअस बजेट योजना २०२३ अंतर्गत उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. राऊत बोलत होते.

डॉ. राऊत यांनी सांगितले की, सर्पदंश हा शेतीसंबंधी होणारा गंभीर अपघात असून, तातडीने उपचार केल्यास रुग्णाचा प्राण वाचू शकतो, सर्पदंश टाळण्यासाठी शेतात काम करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतल्यास उदा. बूट वापरणे, पूर्ण अंगावर कपडे घालणे, रात्रीच्या वेळी अंधारात हातात काठी व बॅटरीच्या उजेडात चालणे, फळबागेत काम करताना डोक्यात टोपी घालणे, रात्रीच्या वेळी जमिनीवर न झोपता कॉटचा वापर करणे, आदी साधे प्रयोग केले, तरी सर्पदंशाचे प्रमाण कमी होऊ शकते.


आपल्या परिसरात आढळणारे नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे चारही साप अतिविषारी असून, यांच्या दंशानंतर तातडीने उपचार घेणे महत्त्वाचे असते. नाग आणि मण्यार यांच्या विषाने रुग्णांच्या मेंदू व हृदयावर दुष्परिणाम होतो. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. रुग्णास कृत्रिम श्र्वासोस्वाची गरज लागते. घोणस व फुरसे चावल्यानंतर रक्त गोठ्ण्याची प्रक्रिया लांबते व रक्ताच्या उलट्या, जुलाब होतात, लघवीवाटे रक्त जाते, रक्तदाब कमी होतो, असेही डॉ. राऊत यांनी नमूद केले.

यावेळी ‘शून्य सर्पदंश मृत्युदर प्रकल्प’ हा माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. तसेच सर्पदंश विषयीचे माहितीपत्रक आणि साहित्य, स्मार्ट बँडेज विद्यार्थ्यांना वाटण्यात आले. डॉ. पल्लवी राऊत यांनी सर्पदंश झाल्यानंतरच्या प्रथमोपचाराविषयी माहिती देऊन बँडेज वापरण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
आदिवासी विकास विभागातील सर्व आश्रमशाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी सांगितले.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.