Skip to main content

काळभैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ अवसरी खुर्द यांचा सतरावा वर्धापन दिन साजरा

मंचर प्रतिनिधी:




काळभैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ अवसरी खुर्द यांचा सतरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष सखाराम तात्या शिंदे होते प्रमुख पाहुणे म्हणून आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष दशरथ भालेराव हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे कार्याध्यक्ष बी एल शिंदे यांनी केले समारंभामध्ये 25 ज्येष्ठ नागरिकांना काठ्या वाटण्यात आल्या तसेच त्यांचा सत्कारही करण्यात आला काळभैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याबरोबरच समाजासाठी ही काम केले पाहिजे आपल्या घरातील लहान मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी आता ज्येष्ठांवर आहे ज्येष्ठांनी स्वतःच्या आनंदासाठी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सामील व्हावे व लवकरात लवकर अवसरी खुर्द मध्ये ज्येष्ठ नागरिक विरंगुळाभवन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली प्रमुख पाहुणे दशरथ भालेराव यांनी आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीची कार्यपद्धती सांगितली ज्येष्ठांना मिळणाऱ्या सवलतींविषयी चर्चा केली. 


अवसरीचा संघ तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाचा झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमात संघाचे कोषाध्यक्ष सखाराम भालेराव सहकोशाध्यक्ष सोपान हुले नांदूरच्या संघाचे अध्यक्ष रंगनाथ वायाळ मंचरचे अध्यक्ष महामुनी सर यांनी आपले विचार मांडले आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शरद शिंदे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा भवन देण्यात येईल व ज्येष्ठांना लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती महाजन यांनी केले तर आभार संघाचे सचिव यांनी मांडले आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सोपानराव नवले उपस्थित होते. अशी माहिती तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे प्रसिद्धी प्रमुख व पेठ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलासराव रासकर यांनी दिली.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.