Skip to main content

शिरूर आंबेगाव मध्ये निर्वाचन आयोगाची विशेष मोहीम सुरू

समर्थ भारत वृत्तसेवा



मंचर, ता. २० : भारतीय निवडणूक आयोगाने दिनांक 01.01.2024 या अर्हता दिनांकावर अधारीत छायाचित्रासह मतदार यादीचे विशेष पुनःनिरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सदर कार्यक्रमानुसार सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकरी हे 21 जुलै 2023 रोजी पासून घरोघरी जाणार आहेत. सदरची मोहिम ही 21 ऑगस्ट पर्यंत राबविली जाणार आहे. या उपविभागात 195 जुन्नर व 196 आंबेगाव शिरूर मतदार संघ असून प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकरी (बी.एल.ओ.) यांची नेमूण केलेली आहे. या मोहिमेमध्ये 80 वर्षावरील मतदारांची यादी तयार करणे, मृत मतदारांचे मृत्यू दाखले घेवून मयत मतदारांची नावे वगळणे, स्थलांतरीत कुटूंबाकडून फॉर्म भरुन घेणे, 18 वर्षे वय पूर्ण झालेल्या मुलामुलींचे नवीन मतदार नोंदीसाठी कागदपत्र स्वीकारणे, आणि मतदार यादीशी अधार कार्ड लिंक करण्यासाठी अधार कार्डची माहीत घेणे, अंध अपंग मतदार यांच्या यादया तयार करणे इत्यादी कामे या मोहिमेत करणेत येणार आहेत.

विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे औचित्य साधून मतदान संघ स्तरावर सदर कार्यक्रम साजरा करण्याच्या दृष्टीने दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने मतदार संघातील मोठया सोसायटी असलेल्या ठिकाणी दि. 22 व 23 जुलै रोजी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सदर ठिकाणी 80 वर्षावरील मतदारांची यादी तयार करणे, मृत मतदारांचे मृत्यू दाखले घेवून मयत मतदारांची नावे वगळणे, स्थलांतरीत कुटूंबाकडून फॉर्म भरुन घेणे, 18 वर्षे वय पूर्ण झालेल्या मुलामुलींचे नवीन मतदार नोंदीसाठी कागदपत्र स्वीकारणे, आणि मतदार यादीशी अधार कार्ड लिंक करण्यासाठी अधार कार्डची माहीत घेणे, अंध अपंग मतदार यांच्या यादया तयार करणे इत्यादी कामे करणेत येणार आहेत. तरी सर्व नागरीकांनी सदर मोहमेस सहकार्य करुन मतदार यादीतील आपल्या नावाची तपासणी करणे, दुबार नावे वगळणे व मतदार यादीचे शुध्दीकरणासाठी सहकार्य करावे असे अहवान करण्यात येत आहे.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.