Skip to main content

कायदा सुव्यवस्थेसाठी आम्ही कटिबद्ध : डॉ. विशाल हिरे



समर्थ भारत वृत्तसेवा
पिंपरी, ता. ६ : लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त हिरे एक अभ्यासू आणी कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून सर्वत्र परिचित आहेत. पिंपरी चिंचवड आणि वाकड परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनास लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने यथोचित सहकार्य करण्यात येईल असे यावेळी संस्थेचे अध्यक्ष बनसोडे यांनी म्हटले आहे.

लोकहीतवादी सेवा संघ हा पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात कार्यरत आहे. या सदिच्छा भेटी दरम्यान हिरे यांनी आश्वासन दिले की शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही कटीबद्द राहू. पिंपरी चिंचवड आणि वाकड परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सक्षम असून, प्रशासनास सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल आणि कृतज्ञ आहोत असेही यावेळी हिरे यांनी म्हटले आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या भेटी प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धर्मराज बनसोडे, अखिलेश साळुंके व राकेश चन्नाल उपस्थित होते. लोकहीतवादी सेवा संघाच्या वतीने पोलीस प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करू असे धर्मराज बनसोडे यांनी यावेळी म्हटले आहे.


लोकहितवादी सेवा संघाचे कार्य

लोकहितवादी सेवा संघाच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांसाठी अन्न आणि औषधोपचार पुरवले जातात. पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील निराधार निराश्रीत लोकांसाठी उबदार कपडे, ब्लॅंकेट्स आणि जेवणाची सोय केली जाते. पिंपरी चिंचवड शहरात या संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...