Skip to main content

वृद्ध महिलेचा दागिन्यांसाठी केला खून

मंचर प्रतिनिधी:



वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून तिचे तोंड मातीत दाबून तिचा खून केल्याची खळबळजनक आणि दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ९) दुपारी मंचर (ता. आंबेगाव) येथे घडली. अंजनाबाई प्रभाकर बाणखेले (वय वर्ष ७८) असे खून झालेल्या वृद्धेचे महिलेच नाव असून ओळखीच्या कामगारानेच तिचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पांढरीमळा मंचर येथे अंजनाबाई प्रभाकर बाणखेले या घरी एकट्याच राहतात. त्यांची तीन मुले मुंबई येथे असतात. एक ओळखीचा कामगार बाणखेले यांना नेहमीच मदत करण्यासाठी घरी येत असे. बाणखेले यांच्या अंगावर सोन्याचे दागिने होते. त्यांच्यावर या कामगाराची नजर होती. सोमवारी दुपारी दोन वाजता अंजनाबाई बाणखेले या घरातून निघून गेल्या. मुंबईतून मुलाने फोन केला मात्र तो बंद लागल्याने त्यांनी शेजाऱ्यांना शोध घेण्यास सांगितले रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंत विष्णू बाणखेले यांनी त्या हरवल्याची तक्रार मंचर पोलिसात दिली. येथून जवळच उजवा कालवा गेल्याने तेथेही शोध घेण्यात आला. संबंधित कामगाराने उसनवारीचे पैसे देण्यासाठी एका व्यक्तीला दागिने दिले होते. ही गोष्ट समजल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्या कामगाराला फोन केला असता त्याने परराज्यात असल्याचे सांगितले. तसेच उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली. संशय बळवल्यानंतर कसून चौकशी केली असता वृद्ध अंजनाबाई बाणखेले यांचा खून झाल्याचे सिद्ध झाले.

मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, वसंतराव बाणखेले, रवींद्र गांजाळे व पोलीस पथकाने शोध घेतला असता घरापासून बऱ्याच अंतरावर असलेल्या शेतामधील गवतात वृद्धेचा मृतदेह आढळून आला. महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील वेल चोरून नेण्यात आले होते. तसेच मातीत तोंड दाबून तिचा खून केला होता. हातातील पाटल्या काढता न आल्याने त्या तशाच राहिल्या होत्या. मंचर येथील रुग्णवाहिका चालक गौरव बारणे यांच्या रुग्णवाहिकेतू मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. मंचर पोलिसांनी पंचनामा केला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...