Skip to main content

जुन्नर तालुक्यातील अवैध मुरूम, वाळू उत्खनन व वाहतुकीस महसूल व पोलिसांचे आशीर्वाद : आ. अतुल बेनके

नारायणगाव प्रतिनिधी:

 जुन्नर तालुक्यात अवैधरित्या वाळू व मुरूम उत्खनन व वाहतुकीस महसूल व पोलीस अधिकाऱ्यांचे आशीर्वाद असल्याचे आ. अतुल बेनके यांनी म्हटले आहे. राज्यातील सरकार बदलल्यामुळे अधिकारी मस्तवाल झाले असून पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना सरकारचे अभय आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून वारंवार पोलीस व महसूल विभागाला सूचना केल्यानंतरही त्यांचे प्रमुख खालील अधिकाऱ्यांना आदेश सोडतात, आणि त्यांचेच बगलबच्चे, एजंट, पक्षाचे नेते संगनमताने असे भ्रष्ट व्यवहार करीत आहे. पत्रकार जेव्हा बातमी करतात तेव्हा दडपशाही केली जाते.
महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी एजंट नेमलेले असून महसूलचे काही अधिकारी हप्ते घेऊन मुरुमाची बेकायदा वाहतूक करण्यास परवानगी देत आहेत. बेकायदा मुरूम, वाळू वाहतूक करणारी गाडी पकडल्यानंतर पैशाची मागणी करतात. पैसे दिले नाही तर तुझी गाडी सोडणार नाही अशी धमकी देतात.


अधिकाऱ्यांनी हप्ते वसुलीसाठी पेटीएमचा एक नंबर दिला असून त्यावर पैसे पाठविण्यास सांगितले जाते. अधिकाऱ्यांच्या चालू असलेल्या भ्रष्ट कारभाराची, एजंटची व पेटीएम नंबरची माहिती माझ्याकडे असून लवकरच ती उघडकीस आणणार आहे. जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला हा गैरप्रकार मान्य नसून काही लोकप्रतिनिधी हप्ते घेण्यासाठी टक्केवारीचा वापर करीत असतील तर माझा त्याच्याशी संबंध नाही. मी अशा प्रकारचे व्यवहार करीत नसून जर कोणी नियमाच्या बाहेर जाऊन चुकीच्या गोष्टी करीत असतील तर त्याला माझा विरोध आहे. (अतुल बेनके, आमदार, जुन्नर)

उत्खनन करण्यासाठी परवाने दिले असून काही ठिकाणी गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. सर्व तलाठी, मंडल अधिकारी यांना परवाना नसलेल्या ठिकाणी उत्खनन होत असल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याव्यतिरिक्त तालुक्यात गैरप्रकार चालू असल्यास आणि आमदार साहेबांनी त्यांच्याकडे असलेली माहिती माझ्या निदर्शनास आणून दिल्यास चुकीच्या गोष्टींना तात्काळ पायबंद घालता येईल. (रवींद्र सबनीस, तहसीलदार, जुन्नर)



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...