Skip to main content

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने अर्भकाचा मृत्यू

शिक्रापूर प्रतिनिधी: 


तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाल्यानंतर नवजात अर्भकाला पुढील उपचारासाठी पुणे येथे घेऊन जायचे असताना शासनाची १०८ रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली असल्याचे समोर आले आहे.        

तळेगाव ढमढेरे येथील घडलेल्या घटनेबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार नेहा बळीराम माने हि विठ्ठलवाडी येथील बावीस वर्षीय महिला  मंगळवार २३ मे रोजी प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेली होती, दुपारी महिलेची प्रसूती झाल्यानंतर बाळाचे वजन तीन किलो तीनशे ग्राम होते, मात्र बाळाचे हृदयाचे ठोके मिनिटाला तीस दरम्यान होते, त्यामुळे निवोनेटल रिसस्कीटेशन द्वारे हृदय सुरु करण्यात आले, परंतु बाळाची परिस्थिती गंभीर होत चालल्याने शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेला तीन वेळा संपर्क केला.

त्यावेळी ऑक्सिजन उपलब्ध असणारी रुग्णवाहिका नसल्याचे सांगत दीड तासाने रुग्णवाहिका उपलब्ध होईल असे सांगण्यात आले, मात्र त्यांनतर ऑक्सिजनची सोय असणाऱ्या खाजगी रुग्णवाहिकेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या बाळाला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले असताना तेथील डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले, तर या घटनेमुळे बाळाची आई नेहा माने यांची प्रकृती खालावली असल्यामुळे त्यांना प्रथम शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय व नंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले रेखा बांदल

तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घडलेल्या प्रकारामध्ये डॉक्टरांची काही चूक नसून त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले तसेच त्यांना शिक्रापूर येथील खाजगी डॉ. शरद लांडगे व डॉ. चंद्रकांत केदारी यांनी देखील मोलाची मदत केली तसेच टीमने खाजगी रुग्णवाहिकेतून बाळाला पुण्याला हलवले परंतु ऑक्सिजनची १०८ रुग्नावाहीला वेळेत न मिळाल्याने सदर प्रकार घडला असल्याचे जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांनी सांगितले.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...