Skip to main content

केंद्र शासनाच्या साखर व कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान: वळसे पाटील

कवठे येमाई प्रतिनिधी:


 शिरुर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक मलठण येथील राजयोग मंगल कार्यालय येथे शुक्रवार (दि.२६) रोजी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे संघटन मजबूत करण्याची आवाहन कार्यकर्त्यांना केले. यावेळी त्यांनी केंद्र शासनावर टीका करताना केंद्र शासनाच्या साखर व कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे सांगितले.

 

जागतिक बाजारात साखरेला भाव असूनही यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळत नाही. केंद्राच्या निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हीच परिस्थिती कांद्याची आहे. जगात कांद्याला मागणी असूनही केंद्र सरकार महागाईचे अपयश झाकण्यासाठी ठराविक वर्गाला खुश करण्यासाठी शेतकऱ्यांना फायदा मिळू देत नाही व कांद्याची निर्यात करत नाही. यावर्षी मोठ्या प्रमाणात रामनवमीच्या मिरवणुका काढण्यात आल्या यामागील काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या काढल्या गेल्या नव्हत्या या मिरवणुकांना भारतीय जनता पक्षाच्या अंगच्या संघटनांनी आर्थिक मदत केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 

  

इतिहास बदलण्याचे काम केले जात आहे. चुकीच्या पाणी वाटप धोरणाला विरोध करण्यासाठी उपोषण करण्याची तयारी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले प्रसंगी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. यावेळी सर्वच बाजूंनी त्यांनी केंद्र  व राज्य सरकारवर टीका केली. महाविकास आघाडी एकत्र राहिली तर आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी व त्यांच्या सहकारी चा विजय निश्चित असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.


याप्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रदीप वळसे पाटील, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, सविता बगाटे, सरपंच दामूआण्णा घोडे, माजी पंचायत समिती सदस्य सुदाम ईचके, अरुणाताई घोडे आदी मान्यवर व मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...