Skip to main content

पंढरपूर येथे मंचरच्या भाविकांसाठी होणार अद्यावत धर्मशाळा

 मंचर प्रतिनिधी:


 ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळ यांच्या मार्फत  पंढरपूर येथे बांधल्या जाणाऱ्या नवीन  धर्मशाळेच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा आणि  मोरडे फुड्स अध्यक्ष हर्षल मोरडे यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी मंचर, शेवाळवाडी, निघोटवाडी सह वारकरी सेवा मंडळाचे 400पेक्षा अधिक भाविक उपस्थित होते.

देवेंद्र शहा म्हणाले की, पंढरपूर येथे मंचरकरांनी साडे पाच गुंठे जागा देणगीतून 55 लाख रुपयांना खरेदी केली आहे. एकूण नऊ हजार स्क्वेअरफुटचे बांधकाम लवकरच पूर्ण होईल. प्रशस्त हॉल, बारा खोल्या, व्यापारी गाळे, स्वयंपाक गृह, भोजनालय, स्वच्छता गृह, बगीचा, पार्किंग आदी सुविधा भाविकांना बाराही महिने उपलब्ध होणार आहेत. धर्मशाळेसाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह अनेक दानशुरांची मदत मिळणार आहे.
मोरडे म्हणाले, माझे आजोबा (स्व) एकनाथ मोरडे व वडील चंद्रकांत मोरडे यांची इच्छा होती की मंचरकरांची धर्मशाळा पंढरपूर मध्ये उभी रहावी. धर्मशाळा इमारतीचे भूमिपूजन हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.

याप्रसंगी कामगार उपायुक्त भास्कर मोरडे, सरपंच नवनाथ निघोट, कांता बाणखेले, बाळासाहेब बाणखेले, दत्ता थोरात, सुनील बाणखेले, राजाराम बाणखेले, नवनाथ डेरे, वसंतराव बाणखेले, प्रवीण मोरडे, भास्कर लोंढे गुरुजी उपस्थित होते. वास्तूविशारद हेमंत पाटील, साजन इंदोरे व बांधकाम व्यवसायिक राहुल अभंग येथील कामकाज पाहत आहे.

धर्मशाळा बांधकामासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन शहा यांनी केले. एक तासात तब्बल सव्वा कोटी रुपयांच्या देणग्या उत्स्फूर्तपणे जमा झाल्या. त्यामध्ये हर्षल मोरडे, देवेंद्र शहा यांनी धनादेश व बाळासाहेब बेंडे,

संजय थोरात, वामनराव गांजाळे, बाबाजी टेमगिरे, प्रशांत बागल यांनी प्रत्येकी एक खोली बांधून देण्याचे जाहीर केले. 40 भाविकांनी प्रत्येकी एक ते दोन लाख रुपये देणगी दिली. कन्या दिपिका योजने अंतर्गत 15 जणांनी प्रत्येकी 27 हजार रुपये देणगी दिली.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...