Skip to main content

घोडेगाव येथे खरीप हंगाम नियोजन बैठक संपन्न

 घोडेगाव प्रतिनिधी:



घोडेगाव येथे पंचायत समिती सभागृहात आंबेगाव तालुक्याच्या खरीप हंगाम नियोजन आढावा बैठकीला मा. गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या उपस्थितत संपन्न झाली. घोडेगाव आणि परिसरातल शेतकऱ्यांच्या समस्येवर चर्चा करण्यात आली. रांजणगाव येथे असलेली वेफर्सची कंपनी बंद होत आहे. बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही कंपनी सुरु राहणे अत्यंत गरजेचे आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाशी लवकरच चर्चा केली जाईल असही यावेळी मा. गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी बोलताना सांगितलं.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील काही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले आहे. या पीकाच्या वाढीसाठी इथल्या मातीचे परिक्षण आवश्यक असल्याचे चर्चेतून समोर आले आहे. या माती परिक्षणासाठी भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माती परिक्षण प्रयोग शाळेचा वापर करण्याचा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला यासाठी लवकरच पावले उचलण्याचा प्रयत्न केला जाईल असही वळसे पाटील यादरम्यान बोले आहे.

खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी आंबेगाव तालुक्यात दोन शेतकरी मेळावे आयोजित करण्याचा मुद्दा या बैठकीत चर्चेत आला. यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असल्याने यासाठी शासनाकडून पाण्याचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी मेळाव्यात या गोष्टीची जगजागृती करण्यासाठी एक मेळावा आदिवासी भागात तर दुसरा मेळावा पूर्व भागात घेण्यात येईल.

याशिवाय आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील हापुस आंब्याचा दर्जा हा कोकणातील हापूस आंब्यापेक्षा चांगला आहे. याला बाजारात मागणी देखील चांगली आहे. या भागात आंबा लागवड वाढावी यासाठी आंब्याच्या बागा व झाडांची अचूक आकडेवारी काढून आंबा लागवडीसाठी स्वतंत्र योजना केली जाईल.



शेतक-यांनी शेतीत युरियाचा वापर कमी केला पाहिजे. यासाठी शेतक-यांना प्रषिक्षण दिले जावे आणि यासोबतच युरीयाची साठेबाजी व युरिआबरोबर औषधे खपविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. यावेळी विविध विभागातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...