Skip to main content

घोडेगाव येथे खरीप हंगाम नियोजन बैठक संपन्न

 घोडेगाव प्रतिनिधी:



घोडेगाव येथे पंचायत समिती सभागृहात आंबेगाव तालुक्याच्या खरीप हंगाम नियोजन आढावा बैठकीला मा. गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या उपस्थितत संपन्न झाली. घोडेगाव आणि परिसरातल शेतकऱ्यांच्या समस्येवर चर्चा करण्यात आली. रांजणगाव येथे असलेली वेफर्सची कंपनी बंद होत आहे. बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही कंपनी सुरु राहणे अत्यंत गरजेचे आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाशी लवकरच चर्चा केली जाईल असही यावेळी मा. गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी बोलताना सांगितलं.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील काही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले आहे. या पीकाच्या वाढीसाठी इथल्या मातीचे परिक्षण आवश्यक असल्याचे चर्चेतून समोर आले आहे. या माती परिक्षणासाठी भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माती परिक्षण प्रयोग शाळेचा वापर करण्याचा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला यासाठी लवकरच पावले उचलण्याचा प्रयत्न केला जाईल असही वळसे पाटील यादरम्यान बोले आहे.

खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी आंबेगाव तालुक्यात दोन शेतकरी मेळावे आयोजित करण्याचा मुद्दा या बैठकीत चर्चेत आला. यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असल्याने यासाठी शासनाकडून पाण्याचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी मेळाव्यात या गोष्टीची जगजागृती करण्यासाठी एक मेळावा आदिवासी भागात तर दुसरा मेळावा पूर्व भागात घेण्यात येईल.

याशिवाय आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील हापुस आंब्याचा दर्जा हा कोकणातील हापूस आंब्यापेक्षा चांगला आहे. याला बाजारात मागणी देखील चांगली आहे. या भागात आंबा लागवड वाढावी यासाठी आंब्याच्या बागा व झाडांची अचूक आकडेवारी काढून आंबा लागवडीसाठी स्वतंत्र योजना केली जाईल.



शेतक-यांनी शेतीत युरियाचा वापर कमी केला पाहिजे. यासाठी शेतक-यांना प्रषिक्षण दिले जावे आणि यासोबतच युरीयाची साठेबाजी व युरिआबरोबर औषधे खपविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. यावेळी विविध विभागातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.