Skip to main content

जिभेने डोळ्यातील कचरा काढणे धोकादायक : डाॅ. स्वप्निल भालेकर

समर्थ भारत वृत्तसेवा


श्रीगोंदा व शिरूर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये असे लोक आहेत, की जे आपली जीभ रुग्णाच्या डोळ्यात फिरवून कचरा काढतात. हा प्रकार करणारे बरेचशे जण तंबाखूसह इतर व्यसन करणारे असतात. यामुळे डोळ्याला गंभीर इजा होऊन दृष्टी जाण्याची शक्यता निर्माण होते. जिभेने डोळ्यातील कचरा काढणे शेकडो लोकांची दृष्टी जाण्यास कारणीभूत ठरत आहे. यामुळे आसे प्रयोग रूग्णांनी करू नयेत; असे आवाहन नेत्र तज्ञ व व्हीजन केअरचे संचालक डाॅ. स्वप्निल भालेकर यांनी केले आहे.
 
डाॅ. भालेकर म्हणाले, डोळे हे मानवी शरीराचा महत्त्वाचा घटक आहे. यामुळे त्याची निगा राखने व काही दुखापत झाल्यास नेत्र रूग्णालयात याचा उपचार घेणे आवश्यक आहे. आमच्याकडे येणा-या रूग्णांमध्ये कचरा जाऊन इजा झालेल्या रूग्णांसह इतर शस्त्रक्रिया करण्यासाठी येत असतात. यामध्ये कचरा गेलेले रूग्ण गावातील अश्या लोकांकडे जाऊन आलेले असतात की, त्याने कुठल्याच प्रकारे या बाबीचे ज्ञान घेतलेले नसते. त्यामुळे जीभेद्वारे हा कचरा काढण्याचा चुकीचा प्रकार हे लोक करतात. यामध्ये व्यसन करणारे लोकही आढळुन येतात. यामुळे डोळ्याला गंभीर इजा होते आणि त्यानंतर आमच्याकडे तो रूग्ण येतो. मात्र तोपर्यंत मोठी इजा रूग्णांच्या दृष्टीला झालेली असते. 



काही दिवसांपूर्वी एक वयस्कर आजी रूग्णालयात आल्या होत्या. त्या ही गावातील एकाकडे डोळ्यातील कचरा काढण्यासाठी गेले असता पूर्ण डोळ्याला जंतुसंसर्ग झाला. यामुळे त्यांची नजर गेली. अशा प्रकारे शेकडो लोकांचे डोळे पूर्णपणे निकामी झालेले मी गेल्या काही वर्षांत पाहिलेले आहेत. म्हणूनच आपल्याला आवाहन करत आहे की इथून पुढे आपल्या आसपास जरी कोणी अशा प्रकारे कचरा काढून घ्यायला जात असेल; तर त्यांना थांबवा कदाचित तुम्ही त्यांचा डोळा आणि दृष्टी वाचवू शकाल. (डॉ. स्वप्नील भालेकर)



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...