Skip to main content

दुचाकी आणि आयशर टेम्पोच्या अपघातात 55 वर्षीय व्यक्तिचा मृत्यू

मंचर प्रतिनिधी:



पेठ ता. आंबेगाव जि. पुणे येथे रानवारा हॉटेल समोर स्प्लेंडर मोटार सायकल आणि आयशर टेम्पोचा अपघात झाला असून या अपघातात बाळू तुकाराम सोनवणे वय वर्ष ५५ यांचा मृत्यु झाला आहे. याबाबत मंचर पोलिस स्टेशनमध्ये आयशर टेम्पो चालकावर दत्ता बाळू सोनवणे यांनी 
फिर्याद नोंदवली आहे.

13 मे 2023 रोजी दुपारी 1.45 वाजताच्या सुमारास पेठ ता. आंबेगाव जि पुणे रानवारा हॉटेल समोर पुणे- नाशिक हायवे वर मयत बाळू तुकाराम सोनवणे (वय वर्ष 55 राहणार शिंगवे पारगाव, सोनवणे वस्ती) यांच्याकडे असणाऱ्या हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक MH12CU6075 ह्या मोटार सायकल वरून नाशिक बाजूकडून पुण्याला बाजूला जाणारा हायवे रोडची लेनने मोटार सायकल चालवत असताना पुण्यावरून नाशिकच्या बाजूकडे आयशर टेम्पो क्रमांक MH15DK6560 ह्या टेम्पोवरील चालक लक्ष्मण विष्णू सहाने (रा. निरामय संकुल रो हाउस नं 15 आंबडगाव ता. जि. नाशिक) याने याच्या ताब्यातील आयशर टेम्पो याच्या अविचाराने आणि रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत टेम्पो चालवत होता. टेम्पो अचानक नाशिकवरून पुण्याला जाणाऱ्या लेनमध्ये घेऊन गेल्याने मयत बाळू तुकाराम सोनवणे यांच्या मोटार सायकलला जोरदार धक्का बसला आणि अपघात झाला. 

या अपघातात मयत बाळू सोनवणे यांच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर मोटार सायकलचे देखील मोठ्या प्रमाणत नुकसान केले आहे. आयशर टेम्पो क्रमांक MH15DK6560 ह्या टेम्पोवरील चालक लक्ष्मण विष्णू सहाने याच्या विरोधात मंचर पोलिस स्टेशनमध्ये दत्ता बाळू सोनवणे यांनी फिर्याद नोंदवली आहे. पुढील  तपास पो. हवा. जांभळे हे करत आहे.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...