Skip to main content

शेतातील पिके नांगरुन कुटुंबाला मारहाण.

समर्थ भारत वृत्तसेवा

शिक्रापूर, ता. २७ : विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे शेताच्या वादातून शेतकऱ्याच्या शेतातील पिकांसह जनावरांचा चारा तीन ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून नुकसान करत शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे योगेश पांडुरंग गवारी, दिपक दत्तात्रय गवारी, महेश दत्तात्रय गवारी, संभाजी पांडुरंग गवारी, भूषण गुरुनाथ गवारी, गुरुनाथ केरबा गवारी यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.                             

विठ्ठलवाडी येथील नवनाथ हंबीर हे शेतात काम करत असताना योगेश गवारी व त्यांचे साथीदार तीन ट्रॅक्टर घेऊन हंबीर यांच्या शेतात आले. त्यांनी शेतातील जनावरांचे गवत, टोमॅटो, कोथंबीर हे पिक ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून नुकसान केले. यावेळी नवनाथ हंबीर व त्यांच्या कुटुंबियांना ट्रॅक्टर घेऊन आलेल्या इसमांना अडवण्याचा प्रयत्न करत तुम्ही पिकांचे ट्रॅक्टरने नुकसान का करता असे म्हटले असता हंबीर यांच्यासह त्यांचे भाऊ, भावजय, मुलगा यांना मारहाण करत जखमी केले. या व्यक्तींनी चक्क अकरा वर्षीय बालिकेला देखील मारहाण केली असून तुम्ही जर पुढे आलात तर ट्रॅक्टरच्या खाली घालू अशी धमकी देऊन हंबीर यांच्या शेतात योगेश गवारी यांच्या नावाची पाटी लावून मारहाण करणारे निघून गेले.  

याबाबत नवनाथ ज्ञानोबा हंबीर वय ४५ रा. मीरगव्हाण वस्ती विठ्ठलवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी योगेश पांडुरंग गवारी, दिपक दत्तात्रय गवारी, महेश दत्तात्रय गवारी, संभाजी पांडुरंग गवारी, भूषण गुरुनाथ गवारी, गुरुनाथ केरबा गवारी सर्व रा. विठ्ठलवाडी ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण करत आहेत.


 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.