Skip to main content

महाविकास आघाडीचा हायटेक प्रचार, तर देवदत्त निकम मतदारांच्या घराघरात पोहोचले.

समर्थ भारत वृत्तसेवा

मंचर, ता. २७ : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रचार संपला. उद्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी तालुक्यातील विविध केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देवदत्त निकम यांच्या बंडखोरीनंतर बाजार समितीच्या निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यानंतर महाविकास आघाडी आणि देवदत्त निकम यांच्या पॅनलने जोरदार प्रचार केला. सेना भाजपही प्रचारात आघाडीवर राहिली. त्यानंतर काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या.

माजी सभापती देवदत्त निकम यांनी मतदारांच्या घराघरात बांधावर आणि शिवारात जाऊन प्रचार केला. सेना (शिंदे गट) भाजप आणि स्वाभिमानीच्या वतीनेही अरुण गिरे यांनी घराघरात जाऊन प्रचार केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यांनी विविध गावातील आपापल्या कार्यकर्त्यांना सांगून मतदारांना चौकात बोलवून प्रचार केला. महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने मतदारांना संपर्क केला. महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींच्या मतदार चौकात जमविण्याच्या आग्रहाखातर गावातील कार्यकर्त्यांनी मतदार कमी आणि कार्यकर्तेच जास्त जमवले. नेते मंडळींनी देखील याच कार्यकर्त्यांसमोर भाषण ठोकून पुढचे गाव गाठण्याचा कार्यक्रम राबविला.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि देवदत्त निकम यांचे पॅनल अशी तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत माजी सभापती देवदत्त निकम यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी स्वतंत्र पॅनल उभे करून, निवडणुकीचे वातावरण तापविले. माजी सभापती देवदत्त निकम यांच्यामुळे धास्तावलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही जोरदार प्रचार केला. सेना (शिंदे गट) भाजपच्या वतीने देखील मतदारांना परिवर्तनाचे स्वप्न दाखवत जोरदार प्रचार करण्यात आला. 

प्रचारानंतर लक्ष्मीदर्शनाची रात्र?

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर, अनेक मतदारांना लक्ष्मीदर्शनाचा लाभ झाला असल्याचे बोलले जात असून, हे लक्ष्मीदर्शन रात्री पार पडले. सोसायटीसाठी ३ हजार आणि ग्रामपंचायत साठी २ हजार तर काही मतदारांना १ हजाराप्रमाने लक्ष्मी दर्शन झाल्याची चर्चा आहे. 

मतदान न करण्याची शपथ देऊन लक्ष्मी दर्शन?

मतदारांकडून लक्ष्मी दर्शनाचा लाभ घेऊनही योग्य उमेदवारालाच मतदान!

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी ठरलेल्या उमेदवाराला मतदान न करण्यासाठी प्रत्येक मतदाराला १० हजार देऊन शपथ दिल्याची चर्चा असून, मतदारांनी देखील लक्ष्मी दर्शनाचा लाभ घेऊनही त्यांनाच मतदान करणार असल्याचे बोलले जात आहे.

मत विक्री करायला भाग पाडणाऱ्यांनाच धडा शिकवणार

स्वतःच्या फायद्यासाठी पैसे देणाऱ्यांशी कुठला इमान?

ज्या लोकांनी चांगल्या उमेदवाराला पाडण्यासाठी मतदारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन दिले, त्यांनी कुठे कष्ट करून आणि घाम गाळून लक्ष्मी दर्शन दिले आहे? बेईमानी करूनच त्यांनी आम्हाला लक्ष्मी दर्शन दिले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर घेतलेली शपथ किंवा त्यांच्याशी ठेवलेला इमान याला काहीही अर्थ नाही. आम्ही लक्ष्मी दर्शन घेऊनही चांगल्याच उमेदवाराला मतदान करणार असे मत लक्ष्मीदर्शनाचा लाभ घेतलेल्या अनेकांनी व्यक्त केले आहे.


 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.