Skip to main content

शिक्रापूर ग्रामपंचायतचे राजकारण वेगळ्या वळणावर.

समर्थ भारत वृत्तसेवा

शिक्रापूर, ता. २६: शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायत मध्ये सरपंच बांदल गटाचा तर उपसरपंच मांढरे गटाचा अशी स्थिती असताना नुकतेच मंगलदास बांदल व आबा मांढरे एकत्र आलेले असताना उपसरपंच पदाच्या निवडणुकीवेळीच अचानक सरपंच रुग्णालयात दाखल झाले असल्याने शिक्रापूरचे राजकारण वेगळ्या वळणावर पोहचून मंगलदास बांदल व आबा मांढरे एकत्र आल्याने गावात वेगवेगळ्या चर्चेंना उधाण आले आहे.                          

शिक्रापूर ग्रामपंचायतमध्ये सरपंच पद आरक्षित असल्याने ते एकच राहणार असताना सध्या सरपंच एका गटाचा तर उपसरपंच एका गटाचा अशी स्थिती असताना सरपंच बांदल गटाचा तर उपसरपंच आबासाहेब करंजे, बापूसाहेब जकाते व आबाराजे मांढरे यांच्या गटाचा राहिलेला आहे. मात्र नुकतेच विरोधक असलेले मंगलदास बांदल व आबाराजे मांढरे दोघे एकत्र आले असताना आज नव्याने उपसरपंच पदाची निवडणूक होणार असताना मंगलदास बांदल व आबाराजे मांढरे यांनी मिळून त्यांच्या गटाचा उपसरपंच करण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र एक सदस्य कमी असल्याने सरपंच गटाचा उपसरपंच सध्या तरी होऊ शकत नाही असे लक्षात येताच अचानकपणे आज पहाटेच्या सुमारास सरपंच रमेश गडदे आजारी असल्याचे सांगत रुग्णालयात दाखल झाले व त्याबाबत अर्ज देखील दिला. तर उपसरपंच गटाने देखील त्यांचा तक्रारी अर्ज देऊ केला. 

उपसरपंच गटाचे माजी उपसरपंच सुभाष खैरे, रमेश थोरात, मयूर करंजे, विशाल खरपुडे, ग्रामपंचायत सदस्या पूजा भुजबळ, मोहिनी मांढरे, सिमा लांडे, वंदना भुजबळ, सारिका सासवडे, कविता टेमगिरे यांनी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात जात ग्रामदैवताला साकडे घालत सरपंच रमेश गडदे यांनी लवकर बरे करुन उपसरपंच पदाची निवडणूक घेण्याची सद्बुद्धी देण्याची प्रार्थना करत सरपंच दाखल असेलल्या रुग्णालयात जात सरपंच यांची विचारपूस करुन तब्बेतीची काळजी घेण्याची विनंती करत डॉक्टरांशी चर्चा करुन सरपंच यांना लवकर बरे करण्याची विनंती केली आहे. मात्र अचानकपणे घडलेल्या घडामोडीमुळे ग्रामस्थ देखील चक्रावून गेले असून शिक्रापूरच्या राजकारणात पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरपंच आजारी असल्याने उपसरपंच पदाची निवडणूक स्थगित 

शिक्रापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज घेण्यात येणार होती. त्याबाबत नोटीस देखील सर्व सदस्यांना दिलेले होते मात्र अचानक आज सकाळी सरपंच रमेश गडदे हे आजारी असल्याबाबतचा त्यांचा अर्ज कार्यालयात प्राप्त झाल्याने सध्या उपसरपंच पदाची निवडणूक स्थगित करण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.


 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.