Skip to main content

कवठे येमाई - लाखनगावला जोडणाऱ्या सिमेंट रोडचे भूमिपूजन.

समर्थ भारत वृत्तसेवा

कवठे येमाई, ता.२७: शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे जिल्हा परिषदेच्या ३०/५४ ग्रामीण रस्ते निधीतून कवठे ते लाखनगाव या रस्त्याचे भूमिपूजन कवठे टाकळी जिल्हा परिषद गटातील अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्वच प्रमुख पक्षातील कार्यकर्ते व नेते हजर होते. 

या भागातील अनेक दिवसांपासूनचा या रस्त्याचा प्रश्न हा लवकरच सोडविला जाणार असल्याने परिसरातून आनंद व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या कवठे गावठाण (पवार राजवाडा) ते लाखणगाव रस्त्याला जोडणारा सुमारे १२५ मीटर लांब व ३ मीटर रुंदीच्या कच्चा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन गुरुवार दि.(२७) रोजी करण्यात आले. या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या ३० / ५४ ग्रामीण रस्ते निधीतून १५ लाख रुपये निधी टाकण्यात आला.        

यावेळी यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, कवठे सरपंच सुनिता पोकळे, उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ, माजी सरपंच बबनराव पोकळे, रामदास सांडभोर, अरुण मुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब डांगे, मिठूलाल बाफना, काशिनाथ पोकळे, फक्कड सांडभोर, पोपट रोहिले, कवठे सोसायटी अध्यक्ष विक्रम इचके, तंटामुक्ती उपाध्यक्ष बबुशा पाटील कांदळकर, सोसायटी संचालक कैलास बच्चे, बाळासाहेब ईचके, एकनाथ सांडभोर, रितेश शहा, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर भाऊसाहेब घोडे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम जाधव, मधुकर रोकडे, राजेंद्र इचके, युवानेते पांडुरंग भोर, सचिन बोऱ्हाडे, बाळशिराम मुंजाळ, किसनराव हिलाळ, निलेश पोकळे,अविनाश पोकळे, मधुकर इचके, स्वप्निल घोडे, समीर पठाण, सुदर्शन बोराडे, स्वस्त धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष गणेश रत्नपारखी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जानकु मुंजाळ, सिने निर्माते भरत रोडे व ग्रामस्थ उपस्थित होते.


 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.