Skip to main content

बिबट्याच्या हल्ल्यात म्हैस ठार.

समर्थ भारत वृत्तसेवा

घोडेगाव, ता. २९: आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्टयातील गंगापूर खुर्द येथे मंगळवारी (ता.२८) पहाटे तीनच्या सुमारास एका बिबट्याने गोठ्यात बांधून ठेवलेल्या एका म्हशीवर हल्ला करून तिला ठार केले. गंगापुर खुर्द परिसरात घनदाट जंगल आहे. या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर असून अधूनमधून या भागामध्ये बिबट्याचे दर्शन होते. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास अर्जुन भिमाजी नरवडे या शेतकऱ्याच्या घराजवळच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या तीन वर्षे वयाच्या म्हशीवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात म्हैस मृत्यूमुखी पडली असून यात या शेतकऱ्याचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 

या अगोदर काही दिवसांपूर्वी बबन बाबूराव ठोसर यांच्या घराशेजारील गोठ्यातूनही अगदी अशाच प्रकारे म्हशीचं एक रेडकू बिबट्याने ठार केले होते. गेल्या पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना असल्याने बिबट्याच्या हल्ल्याने परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. तसेच गावातील नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. सद्यस्थितीला गंगापूर पंचक्रोशीत शेतीकामे आणि कांदा काढणीची लगबग सुरू आहे याचं गांभीर्य लक्षात घेता वन विभागाने तत्काळ पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करून बिबटे जेरबंद करावेत अशी मागणी सरपंच कविता सातकर, उपसरपंच पांडुरंग ठोसर व ग्रामस्थांनी केली आहे.

आदिवासी बांधवांना बिबट्याच्या हल्ल्याची भीती

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यात यापूर्वी बिबट्याचा वावर नव्हता. परंतु अलीकडे या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून आदिवासी भागातील नागरिकांवर हल्ले होऊ शकतात. घोडेगाव येथे वनपरिक्षेत्र कार्यालय असून येथील अधिकाऱ्यांनी फक्त जनजागृती न करता या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 


 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.