Skip to main content

उंचखडक बुद्रुक येथे हिंस्त्र बिबट्या जेरबंद ..!

अकोले प्रतिनिधी :

अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक आणि पंचक्रोशीत गेल्या काही दिवसांपासून हिंस्त्र बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे.या बिबट्यांनी अनेक शेतकऱ्यांवर रात्री अपरात्री शेतीला पाणी देण्यासाठी गेले असता जिवघेणे हमले केले होते. तसेच अनेक पाळीव प्राणी देखील यांनी फस्त केली आहे तरी या बिबट्यांची या परिसरात राजरोसपणे वावर असल्यामुळे लहान मुले देखील भयभीत झाली आहे. याची दखल घेत अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक तथा अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अशोक देशमुख व उंचखडक बुद्रुक गावचे कार्यक्षम उपसरपंच महिपाल देशमुख यांनी गेल्या आठ दिवसांपूर्वीच स्वखर्चाने वनविभागाचा पिंजरा अशोकराव देशमुख यांच्या वस्तीनजीक आणून लावला होता. आज रात्री १:३० वाजता एक बिबट्या या सापळ्यात अडकला तरी आणखी दोन बिबटे हे मोकाटच असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

याप्रसंगी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक तथा अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अशोक देशमुख व उंचखडक बुद्रुक गावचे कार्यक्षम उपसरपंच महिपाल देशमुख यांनी विद्युत वितरण कंपनीकडे शेतीसाठी पुर्ण क्षमतेने दिवसा विद्युतपुरवठा करण्याची मागणी केली आहे. तसेच वनविभागाने गावकऱ्यांच्या मागणीनुसार ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर असतो त्याच ठिकाणी वनभिगाच्या खर्चाने पिंजरा लावावा जेणेकरून या प्रसंगातून शेतकऱ्यांना दिलासा मिळु शकेल. या ठिकाणी बिबट्या पाहण्यासाठी लहान मोठ्यांनी मोठी गर्दी केली होती तरी वनरक्षक सागर त्र्यंबकराव देशमुख व काकड यांनी या बिबट्याचा ताबा घेतला. प्रसंगी किशोरनाना मंडलिक, विलास हासे, सुनिलबापु देशमुख, तात्यासाहेब देशमुख, सचिन देशमुख, भाऊसाहेब खरात, भास्कर वाळुंज, जितेंद्र कसबे, दत्तात्रय वाळुंज, आत्माराम वाळुंज आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.