Skip to main content

कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी उतरले रस्त्यावर.

समर्थ भारत वृत्तसेवा:

कांद्याचे भाव कोसळत असल्याने विविध मागण्यांसाठी सोमवारी महाविकास आघाडीतर्फे नांदगाव-येवला मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे नांदगाव तालुक्यातील पाच माजी आमदारांनी या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनामुळे नांदगाव-येवला मार्गावरील वाहतूक दीड ते दोन तास ठप्प होती.

सोमवारी कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट यासह सहकारी राजकीय पक्ष, संघटनांनी एकत्रित येत नांदगावमध्ये रास्ता-रोको आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व तालुक्यातील अॅड. अनिल आहेर, अॅड. जगन्नाथ धात्रक, पंकज भुजबळ, संजय पवार, राजाभाऊ देशमुख या पाच माजी आमदारांनी केले. त्यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी गणेश धात्रक, संतोष बळीद, विजय पाटील, हरिश्वर सुर्वे, संतोष गुप्ता व कार्यकत्यांनी आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर ठाण मांडले. आंदोलकांनी तब्बल दीड ते दोन तास नांदगाव-येवला मार्ग रोखून धरला. या वेळी रस्त्यावर वाहनांची एकच गर्दी झाली. तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आहेत मागण्या:-

कांद्यास प्रति क्विंटल एक हजार अनुदान मिळावा.

नार-पार योजनेत नांदगावचा समावेश करण्यात यावा.

शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळावी.

नांदगाव रेल्वे स्थानकात रेल्वे गाड्यांना थांबे मिळावे.



 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.